हा महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव राहील. आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीमुळे सुद्धा आपण त्रासून जाल. प्रणयी जीवनासाठी हा महिना ठीक राहील. आपणास प्रेमिकेसह दूरवरच्या प्रवासास जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी जास्त धावपळ करू नये. तसेच त्यांना आपले मन शांत ठेवावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. त्यांना सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठा फायदा होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडेल. अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. ह्या महिन्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ह्या महिन्यात आपली प्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याने आपण लवकर आजारी पडू शकता. एखादा संसर्ग संभवतो. व्यायाम व ध्यान - धारणा करून आपणास आराम वाटू शकतो. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.