शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

जन-धनमधील खात्यात कधी येणार ‘धन’?

By admin | Updated: December 8, 2014 22:29 IST

सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या

विम्याचा लाभ गुलदस्त्यात : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकांना मार्गदर्शक सूचना नाही
अमरावती : सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या प्रक्रियेबाबत बँकांना कोणत्याच मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शून्य बॅलेन्सवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अपघाती विमा संरक्षणाचे आमिष दाखविण्यात आले होते. अद्याप तरी कुण्याच खातेदाराला अपघाती विम्याचा लाभ मिळालेला नाही. अद्यापही नॅशनल पेमेंट कार्पोरेशनकडून बँकांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
अपघाती विम्याचा हप्ता शासनाच्यावतीने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन भरणार आहे. बँकांनी किंवा विमा कंपन्यांना अद्यापही विम्याच्या अदायगीबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जन-धन योजनेच्या खातेधारकांचा अपघात झाल्यास तूर्तास तरी त्याला जन-धन योजनेचा लाभ मिळणार नाही.
जन-धन योजना १५ आॅगस्ट २०१४ पासून सुरू करण्यात आली. शून्य बॅलेन्सवर खाती उघडण्याची प्रक्रिया देशभर राबविण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लिड बँकेच्या अखत्यारीतील सर्व बँकेत नोव्हेंबर अखेर १ लाखावर खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी ६५ हजार खातेधारक ग्रामीण भागातील आहेत. यावर्षीच्या सरकारनेही बँकेच्या प्रवाहात सर्व नागरिकांना आणण्यासाठी आर्थिक समावेशन योजना गेल्या चार वर्षांपासून राबविल्या आहेत. जन-धन योजनेचा उद्देशही तोच आहे. एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचा जीवन विमा, पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्रॉफ्ट, हे लाभ या योजनेत समाविष्ट आहेत.
खातेदारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मात्र त्याला जन-धन योजनेतील ३० हजार रुपये विमा रक्कम मिळणार आहे. या विम्याची रक्कम एलआयसी भरणार आहे. त्यासाठी एलआयसीने राखीव ठेवलेल्या १०० कोटी रुपयांचा राखीव निधी वापरणार आहे. यासाठी शासनाने एलआयसीला मार्गदर्शक सूचना मागील महिन्यात जारी केल्या आहेत. (प्रतिनिधी)