शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:19 IST

मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात पाच बळीरस्त्यातील धडकेसाठी कधी मिळणार मदत?

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये पाच जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, रस्त्यावर वन्यप्राण्याची धडक लागून वाहनचालक जखमी झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे अपघाताच्या मंगळवार व बुधवारी पाठोपाठ तीन घटना घडल्या. यामध्ये मंगरूळ दस्तगीर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर उमदा युवक माधव काळे (३५) यांचा गुरुवारी सेवाग्राम येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाचीला पेपरला सोडून परत येत असताना रानडुकरांच्या कळपाला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला.रानडुक्कर, रोहींच्या कळपामुळे रस्त्याने दुचाकीच नव्हे, चारचाकी वाहनेही सांभाळून चालविण्याची वेळ आली आहे. तिवसानजीक बुधवारी रोहीला धडकलेली पोलीस व्हॅन थोडक्यात बचावली.रानडुकरांचे सर्वाधिक हल्लेवन्यप्राण्यांचे हल्ले तसेच त्यांच्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक रानडुकरांनी घडविले आहेत. २०१६ मध्ये ११, २०१७ मध्ये १८, तर २०१८ मध्ये २० जण गंभीर जखमी झाले. २०१७ मध्ये अशा प्रकरणांमध्ये दोघांनी प्राण गमावले, तर यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघाने दोघांचा जीव घेतला, तर गुरुवारी माधव काळे यांचा मृत्यू झाला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.रस्ता अपघातात कधी मिळणार मदतवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतात काम करताना शेतमजूर -शेतकरी जखमी झाल्यास शासन त्यांना आर्थिक मदत देते. मात्र, रस्त्यावर वन्यप्राण्यांमुळे अपघात झाल्यास मदत मिळत नाही. वनविभागाने पंचानामा करून शासनस्तरावर आतापर्यंत २७ प्रकरणे पाठविली आहेत.६२ पाळीव ठरले बळीहिंस्त्र श्वापदांच्या बळी ठरलेल्या ६२ पशूंकरिता मागील तीन वर्षांत पशुमालकांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात आली आहे. ती तोकडी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांना मदत अपुरीआठ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. कितीही नुकसान झाले तरी पंचवीस हजार रुपये मदत शासन, वनविभाग करते. ती अपुरी आहे.वन्यप्राण्यांमुळे रस्त्यावर अपघात झाला, तर त्याचा पंचनामा करून आम्ही शासनस्तरावर पाठवितो. आम्ही पंचनाम्यात तसे नमूद करतो.- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :wildlifeवन्यजीव