शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:19 IST

मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात पाच बळीरस्त्यातील धडकेसाठी कधी मिळणार मदत?

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये पाच जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, रस्त्यावर वन्यप्राण्याची धडक लागून वाहनचालक जखमी झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे अपघाताच्या मंगळवार व बुधवारी पाठोपाठ तीन घटना घडल्या. यामध्ये मंगरूळ दस्तगीर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर उमदा युवक माधव काळे (३५) यांचा गुरुवारी सेवाग्राम येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाचीला पेपरला सोडून परत येत असताना रानडुकरांच्या कळपाला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला.रानडुक्कर, रोहींच्या कळपामुळे रस्त्याने दुचाकीच नव्हे, चारचाकी वाहनेही सांभाळून चालविण्याची वेळ आली आहे. तिवसानजीक बुधवारी रोहीला धडकलेली पोलीस व्हॅन थोडक्यात बचावली.रानडुकरांचे सर्वाधिक हल्लेवन्यप्राण्यांचे हल्ले तसेच त्यांच्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक रानडुकरांनी घडविले आहेत. २०१६ मध्ये ११, २०१७ मध्ये १८, तर २०१८ मध्ये २० जण गंभीर जखमी झाले. २०१७ मध्ये अशा प्रकरणांमध्ये दोघांनी प्राण गमावले, तर यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघाने दोघांचा जीव घेतला, तर गुरुवारी माधव काळे यांचा मृत्यू झाला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.रस्ता अपघातात कधी मिळणार मदतवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतात काम करताना शेतमजूर -शेतकरी जखमी झाल्यास शासन त्यांना आर्थिक मदत देते. मात्र, रस्त्यावर वन्यप्राण्यांमुळे अपघात झाल्यास मदत मिळत नाही. वनविभागाने पंचानामा करून शासनस्तरावर आतापर्यंत २७ प्रकरणे पाठविली आहेत.६२ पाळीव ठरले बळीहिंस्त्र श्वापदांच्या बळी ठरलेल्या ६२ पशूंकरिता मागील तीन वर्षांत पशुमालकांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात आली आहे. ती तोकडी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांना मदत अपुरीआठ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. कितीही नुकसान झाले तरी पंचवीस हजार रुपये मदत शासन, वनविभाग करते. ती अपुरी आहे.वन्यप्राण्यांमुळे रस्त्यावर अपघात झाला, तर त्याचा पंचनामा करून आम्ही शासनस्तरावर पाठवितो. आम्ही पंचनाम्यात तसे नमूद करतो.- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :wildlifeवन्यजीव