शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:19 IST

मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात पाच बळीरस्त्यातील धडकेसाठी कधी मिळणार मदत?

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये पाच जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, रस्त्यावर वन्यप्राण्याची धडक लागून वाहनचालक जखमी झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे अपघाताच्या मंगळवार व बुधवारी पाठोपाठ तीन घटना घडल्या. यामध्ये मंगरूळ दस्तगीर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर उमदा युवक माधव काळे (३५) यांचा गुरुवारी सेवाग्राम येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाचीला पेपरला सोडून परत येत असताना रानडुकरांच्या कळपाला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला.रानडुक्कर, रोहींच्या कळपामुळे रस्त्याने दुचाकीच नव्हे, चारचाकी वाहनेही सांभाळून चालविण्याची वेळ आली आहे. तिवसानजीक बुधवारी रोहीला धडकलेली पोलीस व्हॅन थोडक्यात बचावली.रानडुकरांचे सर्वाधिक हल्लेवन्यप्राण्यांचे हल्ले तसेच त्यांच्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक रानडुकरांनी घडविले आहेत. २०१६ मध्ये ११, २०१७ मध्ये १८, तर २०१८ मध्ये २० जण गंभीर जखमी झाले. २०१७ मध्ये अशा प्रकरणांमध्ये दोघांनी प्राण गमावले, तर यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघाने दोघांचा जीव घेतला, तर गुरुवारी माधव काळे यांचा मृत्यू झाला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.रस्ता अपघातात कधी मिळणार मदतवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतात काम करताना शेतमजूर -शेतकरी जखमी झाल्यास शासन त्यांना आर्थिक मदत देते. मात्र, रस्त्यावर वन्यप्राण्यांमुळे अपघात झाल्यास मदत मिळत नाही. वनविभागाने पंचानामा करून शासनस्तरावर आतापर्यंत २७ प्रकरणे पाठविली आहेत.६२ पाळीव ठरले बळीहिंस्त्र श्वापदांच्या बळी ठरलेल्या ६२ पशूंकरिता मागील तीन वर्षांत पशुमालकांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात आली आहे. ती तोकडी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांना मदत अपुरीआठ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. कितीही नुकसान झाले तरी पंचवीस हजार रुपये मदत शासन, वनविभाग करते. ती अपुरी आहे.वन्यप्राण्यांमुळे रस्त्यावर अपघात झाला, तर त्याचा पंचनामा करून आम्ही शासनस्तरावर पाठवितो. आम्ही पंचनाम्यात तसे नमूद करतो.- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :wildlifeवन्यजीव