शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते केव्हा घेणार मोकळा श्वास?

By admin | Updated: January 19, 2015 23:56 IST

अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

अमरावती : अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील एकच नव्हे तर तीन संकुलांच्या लिजची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाकडून ते हटविण्यासाठी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.टांगा पडाव ते वलगाव मार्ग, बापट चौक ते तहसील तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यालगतच्या लिज संपलेल्या संकुलांमुळे वाहतूक विस्कळीत होते. पादचाऱ्यांनाही त्रास होतो. या तीनही संकुलांचे लीज काही वर्षांपूर्वीच संपले असून संकुलातील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करुन राजरोसपणे व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. टांगा पाडाव ते वलगाव मार्गावर दर ५ ते १० मिनिटांनी ‘ट्रॅफीक जाम’ होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. असे असताना रस्त्यालगतचे अतिक्रमीत संकुल का हटविले जात नाही? याची कारणमिमांसा केल्यास बरेच गौडबंगाल उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर काही जणांना व्यवसाय करता यावा, यासाठी त्यावेळी जिल्हा प्रशासनाने लिजवर जागा दिल्या होत्या. नाममात्र भाडे घेऊन व्यावसायिकांना जागा देण्यामागे प्रशासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, लिजच्या जागेवर असलेले हे अतिक्रमित संकुल आजमितीस अपघातासाठी कारणीभूत ठरु लागले आहेत. ज्यांनी नाममात्र भाडे देऊन जागा वापरली, ते कोट्यधीश झाले. परंतु लीज संपल्यानंतरही प्रशासनाला जागा परत देण्याची त्यांची मानसिकता नाही. महानगरातील प्रमुख मार्गावर हे तीन संकुल असून त्यांचे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे. परकोट भिंतीच्या बाजूला असलेल्या या अतिक्रमीत संकुलांमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. बापट चौक ते तहसील मार्गावरील संकुलांची हिच परिस्थिती आहे.