शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

मृगाच्या हत्तीने फिरविली पाठ आर्द्राचा मोर तारेल काय?

By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST

पावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्र सुरू ठेवते.

सुरेश सवळे - चांदूरबाजारपावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्र सुरू ठेवते. यंदा मृग नक्षत्राच्या हत्ती या वाहनापासून ‘स्वाती’चा ‘घोडा’ या वाहनापर्यंत किमान पाऊस असल्याचा अंदाज यापूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाल्यानंतरही पावसाने जोर धरला नाही. मृग नक्षत्राच्या हत्तीने यावर्षी पाठ फिरविल्याने १५ दिवसात केवळ ३६.६६ मी.मी. पाऊस झाल्याने शेतकरी पार भांबावून गेला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्राचा मोर तारेल आणि पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या दोन दिवसात कोरडेच पडल्याने शेतकऱ्यांची पेरणी पार रखडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २२२ मी.मी. पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत २४८ मी.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र ३६.६६ मी.मी. वरच समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत तालुक्यात कापूस ५७४२ हेक्टर, सोयाबीन ८२७४ हेक्टर, तूर २७४१ हेक्टर, ज्वारी १४६ हेक्टर, मूग ५० हेक्टर, उडीद ३५ हेक्टर असे एकूण १६ हजार ९६८ हेक्टर जमिनीत खरिपाची पेरणी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ९५ हेक्टर कपाशीची पेरणी झाली आहे.८ जूनला मृग नक्षत्र लागले. या नक्षत्रात सहसा पावसाचे आगमन सुनिश्चित समजल्या जाते. गत वर्षी मान्सून १० जूनलाच विदर्भात धडकला होता. हा पाऊस अनेक दिवस सक्रिय राहिल्याने जून महिन्यात तब्बल २४८ मी.मी. पाऊस बरसला. यावेळी २४ जूनपर्यंत केवळ ३६.६६ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने दांडी मारल्याने बळीराजाला सर्वाधिक चिंता लागली आहे. आणखी उशीर झाल्यास खरीप पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मृगाच्या हत्तीने सोंड फिरविल्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या शेतकऱ्यांची आर्द्रा या नक्षत्रावर लक्ष लागून आहे. हे नक्षत्र दमदार पावसाचे मानले जाते. याचे वाहन मोर असल्याने थांबून-थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिले चरण सध्या तरी कोरडे दिसत आहे. तरीही दुसऱ्या चरणात अर्थात २६ ते ३० जून दरम्यान चांगल्या पावसाचे योग आहेत असे महाराष्ट्रीय पंचांगात नमूद आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानुसार मान्सूनने विदर्भात धडक दिली असली तरी नैर्ऋत्येकडून येणाऱ्या मोसमी पावसाच्या वाऱ्याचा जोर कमी आहे.