शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अप्परवर्धा धरणात जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST

फोटो - ०७एएमपीएच०६, ०७एएमपीएच०७ मोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाणारे अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा मंगळवारी ९३ ...

फोटो - ०७एएमपीएच०६, ०७एएमपीएच०७

मोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाणारे अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा मंगळवारी ९३ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख व कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यानंतर धरणाची दोन दारे दुपारी ४ वाजता पाच सेंटिमीटरने उघडण्यात आली. त्यामधून १६ दलघमी प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठी येत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्या पूर्णतः ओसांडून वाहत आहेत. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेश येथील जाम नदी, पाक नदी, सालबर्डी येथून वाहणारी माडू नदी तसेच दमयंती, नळा नदीलासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अप्पर वर्धा धरणात पाण्याची आवक वाढली. परिणामी धरण ९३ टक्के भरले. त्यामुळे आता पर्यटकांना उत्सुकता लागलेले हे नयनरम्य दृश्य बघण्याचा योग प्राप्त झाला आहे.

मोर्शी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी असून सध्या अप्पर वर्धा धरणाची पातळी ३४२.३ मीटर झाली आहे. या धरणामधून अमरावती, मोर्शी यासारख्या मोठ्या शहराला पिण्याचे पाणी पुरविले जाते. सिंचनाकरिता कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. याच धरणातील पाण्यावर मोर्शी तालुक्यासह वरूड, तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असते.

सप्टेंबर महिन्यात अप्पर वर्धा धरण क्षेत्रात चांगला पाऊस कोसळल्याने धरण निर्धारित पातळी गाठून १३ दारे उघडली जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे. उपविभागीय अभियंता रमण लायचा, गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी पर्यचकांना आवरण्यासाठी सज्ज आहेत. दारे उघडण्यात येत असल्याचे वृत्त कळताच जिल्ह्यातील पर्यटक पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी धरण परिसरात गर्दी करीत आहेत.