शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

१५० गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2017 00:01 IST

जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ..

नागरिकांना मनस्ताप, भूजलस्तर घटलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही कोसभर अंतरावरून ग्रामीण जनतेला पाणी भरावे लागत असल्याचे वास्तव आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी आबालवृद्धांची सुरू असलेली वणवण पाहिली की, प्रशासन पाणीटंचाईबाबत नेमक्या कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा प्रश्न पडतो. पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब नाकारली असली तरी अद्यापही अनेक गावांमध्ये पाणीसमस्या कायम असल्याच्या बाबीला मात्र दुजोरा दिला आहे. मेळघाटसह जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये कृत्रीम तर काही ठिकाणी कायमस्वरूपी पाणीटंचाई भेडसावत असते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनीच जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान कबुल केली होती. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कोटयवधीचा कृतीआराखडा तयार केला जातो. भारनियमनामुळे पाणीटंचाई तीव्रअमरावती : एखाद्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी आराखड्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजना, देखभाल दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती, कुपनलिका आदी उपाययोजना करण्यात येतात. मात्र, अद्यापही बहुतांश गावांमधील अनेक कुपनलिका बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजलस्तर खालावला आहे.पाठपुराव्यानंतरही दखल नाहीजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासह जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या दोन्ही विभागांच्या कार्यकक्षेत मोडणाऱ्या गावांमधील पाणीसमस्या मांडण्यासाठी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी या विभागाकडे पाठपुरावा करतात. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. प्राधिकरणच्या बाबतीत अनेकदा हा अनुभव आला आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई नाही . जेथे पाणीसमस्या होती, तेथे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, तात्पुरती नळपूरक योजना, टँकर सुरू केले आहेत. याकडे पाणीपुरवठा विभाग गांभीर्यपूर्वक उपाययोजना करीत आहे.- के.टी.उमाळकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग