शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१५० गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2017 00:01 IST

जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ..

नागरिकांना मनस्ताप, भूजलस्तर घटलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही कोसभर अंतरावरून ग्रामीण जनतेला पाणी भरावे लागत असल्याचे वास्तव आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी आबालवृद्धांची सुरू असलेली वणवण पाहिली की, प्रशासन पाणीटंचाईबाबत नेमक्या कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा प्रश्न पडतो. पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब नाकारली असली तरी अद्यापही अनेक गावांमध्ये पाणीसमस्या कायम असल्याच्या बाबीला मात्र दुजोरा दिला आहे. मेळघाटसह जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये कृत्रीम तर काही ठिकाणी कायमस्वरूपी पाणीटंचाई भेडसावत असते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनीच जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान कबुल केली होती. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कोटयवधीचा कृतीआराखडा तयार केला जातो. भारनियमनामुळे पाणीटंचाई तीव्रअमरावती : एखाद्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी आराखड्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजना, देखभाल दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती, कुपनलिका आदी उपाययोजना करण्यात येतात. मात्र, अद्यापही बहुतांश गावांमधील अनेक कुपनलिका बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजलस्तर खालावला आहे.पाठपुराव्यानंतरही दखल नाहीजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासह जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या दोन्ही विभागांच्या कार्यकक्षेत मोडणाऱ्या गावांमधील पाणीसमस्या मांडण्यासाठी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी या विभागाकडे पाठपुरावा करतात. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. प्राधिकरणच्या बाबतीत अनेकदा हा अनुभव आला आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई नाही . जेथे पाणीसमस्या होती, तेथे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, तात्पुरती नळपूरक योजना, टँकर सुरू केले आहेत. याकडे पाणीपुरवठा विभाग गांभीर्यपूर्वक उपाययोजना करीत आहे.- के.टी.उमाळकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग