शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नांदगावात पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:58 PM

तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देबेंबळा व साखळी नद्या कोरड्या : गेल्या सात वर्षांत यंदा कमी पावसाची नोंद

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत खळाळून वाहणाऱ्या या नद्यांची धार काही दिवसापूर्वीच बंद झाली आहे. नदीपात्रात फक्त खोलगट भागात पाण्याचे डबके तेवढे शिल्लक उरले आहेत.गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा फक्त ५११ मि.मी. इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गावागावांतून वाहणारे नाले तर कधीचेच कोरडे पडले. यंदा जानेवारीपासूनच काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मंगरुळ चव्हाळा येथील साखळी नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करण्यात आले होते. पण, नदीलाच पाणी नसल्याने तेथील बंधाऱ्यात पाणी अडून साठले नाही. गेल्या वर्षभरापासून अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. आताच येथे पाणी टंचाईची झळ गावकऱ्याना सोसावी लागत असल्याचे येथील ग्रामस्थ अतुल ठाकूर यांनी सांगितले.तालुक्यात ६८ ग्रामपंचायती असून, गावांची संख्या १२९ आहे. गावोगावी आगामी काळात उग्र होऊ पाहणाऱ्या पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. शेतातील विहिरींची पाण्याची पातळी खालावत असल्याने फळबागा व रबी हंगाम धोक्यात आला आहे. प्रशासनाने वेळीच व्यवस्थापन न केल्यास आगामी काळात भीषण टंचाईचे सावट आहे.परिसरातील सर्वांत मोठी नदी असलेली साखळी दोन महिन्यांपूर्वीच कोरडी पडली. गावाच्या शिवारातील नाला कोरडा ठणठणीत अहे, नदी-नाले कोरडे पडल्याने जनावरांना शिवारात कुठेही पाणी नाही. जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाईचे संकेत आताच स्पष्टपणे दिसू लागले आहेत.- रूपाली सुनील इंझळकरसरपंच, सालोडगावालगत वाहणारी जळू नदी कोरडी झाली आहे. डिसेंबरनंतरच पाणीटंचाई जाणवणार आहे, विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. शेतातील विहिरींना पाणी कमी असल्यामुळे यंदा रबीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.- राजेंद्र सरोदेमाजी सरपंच, माहुली चोर