शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

नंदनवनात पाणी पेटले : दिवसाआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 5:00 AM

शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे. 

नरेंद्र जावरे  लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शहराची तहान भागविणारा इंग्रजकालीन सक्कर तलाव दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगतीच्या कामाने पावसाळा तोंडावर असताना अपूर्ण आहे. जानेवारी महिन्यापासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशात संबंधित विभाग आणि कंत्राटदाराची मनमानी व नियमबाह्य सुरू असलेले काम नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करणारे ठरले आहे.शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे. 

नव्याने निविदा, ५० लाखांनी बजेट वाढलेयंदा पुन्हा सक्कर तलावाचे काम अर्ध्यातून पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आल्या. त्यामध्ये संबंधित विभागाने प्रचंड वेळ घेतला. परिणामी मे महिना उजाडला आणि आता कामाला सुरुवात झाली. यादरम्यान वर्ष वाढताच ५० लाखांनी बजेट वाढले.

जानेवारीतच केला तलाव खालीतलावाचे उर्वरित पुढील काम करण्यासाठी जानेवारी महिन्यातच तत्काळ तलाव रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आणि पाणीपुरवठा विभागाने तलाव रिकामासुद्धा केला. शहरवासीयांना तेव्हापासूनच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला मे महिना उजाडला. 

थातूरमातूर काम आणि कंत्राटदाराचे पलायन सक्कर तलाव पाणीपुरवठा करणारा मुख्य तलाव आहे. त्याच्या प्रमुख भिंतीला लीकेज असल्याने १ कोटी ८३ लाखांच्या जवळपास निधी शासनाने मंजूर केला. गतवर्षी संबंधित विभागामार्फत कामाला सुरुवात झाली; परंतु आवश्यक असलेली काळी माती करजगाव आणि मुरुम गंगाधरी व कविठा खदानीमधून (लीड) देण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने जवळपास काळी माती आणि मुरुमाचा शोध घेतला; परंतु इको-सेन्सिटिव्ह झोन असल्याने प्रशासनाने नियमावर बोट ठेवले आणि चिखलदरा तहानलेले राहिले. ५० लाखांपेक्षा अधिक काम करून कंत्राटदाराने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविली व पळ काढला.

प्रक्रिया सुरू झाली आहे. तातडीने काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. निविदा प्रक्रिया करण्यात विलंब झाला.- चैतन्य खंडारे, उपअभियंता, अचलपूर

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई