शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?
2
महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२४ : घरात सुखशांती नांदेल, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील
4
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क
5
WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला
6
अकरावी-बारावीसाठी हजार रुपये, तर पदव्युत्तरसाठी मुलींना २,५०० रुपये, आसाम सरकार देणार विद्यावेतन
7
Dombivali MIDC Blast: कंपन्या हलवणे ‘सोयी’नुसार पोस्टिंग देण्याइतके सोपे आहे का?
8
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
9
वैष्णोदेवीला जाणाऱ्यांवर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानी खेळाडूने केला निषेध, म्हणाला...
10
अवघ्या पाच महिन्यांत क्रॅक केली चौथी पोस्ट! हॅट्ट्रिक झाली, आता नम्रताचा चौकार!
11
सूड उगविण्यासाठी अभिनेत्रीनेच केले प्रवृत्त, अश्लील कमेंटमुळे दर्शन चिडला अन्..., धक्कादायक गौप्यस्फोट
12
पुरुषांना १०० तर महिलांना ४० रुपये! वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समाेर
13
विश्वचषक पात्रता स्पर्धा; ‘त्या’ वादग्रस्त गोलची चौकशी करा! भारतीय फुटबॉल महासंघाची मागणी
14
दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी
15
पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणातील निष्कर्ष
16
दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद
17
IND vs AUS : टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? IND vs AUS 'सुपर' लढत होण्याची शक्यता
18
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 
19
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक

राज्यातील उद्योगांवर भरारी पथकाचा ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 4:46 PM

राज्यातील उद्योगांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) या पथकाची स्थापना करण्यात आली.

 - प्रदीप भाकरे अमरावती - राज्यातील उद्योगांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) या पथकाची स्थापना करण्यात आली असून, पथकप्रमुखांना त्यांचा गोपनीय अहवाल सात दिवसांच्या आत एमपीसीबीला सादर करणे बंधनकारक आहे.राज्यात जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, नागरी घनकचरा, प्लास्टिक कचरा, घातक घनकचरा याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी, त्याअनुषंगाने माहिती अधिकाराचे वाढते अर्ज, जनहित याचिका, उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल होणारे खटले याअनुषंगाने १९ एप्रिलच्या आदेशान्वये भरारी पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाची कालमर्यादा तीन महिन्यांची आहे. राज्यातील प्रदूषणाबाबत विधिमंडळामध्ये उपस्थित होणारे प्रश्न, लक्षवेधी यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रदूषित उद्योगांची तपासणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने राज्यातील उद्योगांची तपासणी करण्याकरिता भरारी पथकाची स्थापना करण्यात आली. राज्यातील सर्व प्रकारच्या उद्योगांची तपासणी हे पथक करणार आहेत. एमपीसीबीचे अध्यक्ष वा सचिवांनी जारी केलेल्या गोपनीय निर्देशांवर हे भरारी पथक कार्य करेल. पथकप्रमुखांनी सदस्य सचिवांच्या निर्देशानुसार कृती आराखडा तयार करावयाचा आहे.

भरारी पथकाची रचना प्रधान वैज्ञानिक अधिकारी-प्रादेशिक अधिकारी (मुख्यालय) दर्जाचे संबंधित विभागप्रमुख हे भरारी पथकाचे प्रमुख राहतील, तर कल्याणचे उपप्रादेशिक अधिकारी सुजित ढोलम, ठाणेचे उपप्रादेशिक अधिकारी सागर किल्लेदार, रायगडचे उपप्रादेशिक अधिकारी सचिन आडकर, क्षेत्र अधिकारी कार्तिक लंगोटे, मिलिंद ठाकूर, सुधीर भताणे व गजानन पवार हे सदस्य असतील.

या उद्योगांची तपासणी राज्यात १७ प्रमुख गटांमध्ये उद्योगाची वर्गवारी करण्यात आली आहे. यात माहिती-तंत्रज्ञान, इंधन, धातू, रसायने व खते, वस्त्रोद्योग, साखर, परिवहन, फोटोग्राफिक फिल्म व कागद, सिमेंट जिप्सम, औद्योगिक यंत्रसामग्री, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स, प्रक्रिया केलेले अन्न, वनस्पती तेल व वनस्पती, औषधी, कागद व कागद उत्पादने, अभियांत्रिकी, यांत्रिकी साधने, सिरॅमिक, संकीर्ण उद्योग व इतर उद्योगांचा समावेश आहे.

१७ प्रकारचे ८९७४ प्रकल्प कार्यान्वित उद्योगाच्या प्रकारानुसार सन १९९१ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत राज्यात ११ लाख ८९ हजार ८१५ कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या उद्योगांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत. त्यापैकी २ लाख ९२ हजार २५२ कोटी रुपये गुंतवणूक असलेले ८९७४ प्रकल्प तूर्तास कार्यान्वित आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात ही सांख्यिकी दिली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसायpollutionप्रदूषण