शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बाराखडी शिकायची ? मग तुम्हीच शाळेत जा अन् नोंदणी करा !

By जितेंद्र दखने | Updated: December 6, 2023 20:58 IST

४७ हजारांवर अंगठेबहाद्दर : बहिष्काराने साक्षरता अभियान ठप्प

अमरावती: २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५० हजार नव्हे, तर सुमारे  ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत. केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या नव भारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून या निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख करून देण्यात येणार आहे. मात्र, सर्वेक्षणावरच शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी या अभियानाला गती आली नाही.

शिक्षक सर्वेक्षण करायला तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता शिक्षण संचालकांनीच "बाराखडी शिकायचंय? तर तुम्हीच शाळेत जाऊन नोंदणी करा", अशी साद नागरिकांना घातली आहे, हे विशेष. निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख व्हावी, यासाठी यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून अनेकांना अक्षर ओळखही झाली; मात्र १०० टक्के निरक्षर साक्षर झाले नाहीत. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत.

नव भारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून २०२२ व २०२३ या दोन वर्षांत ४७ हजार ५४० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे हे अभियान पुढे सरकू शकले नाही. शिक्षण विभागाकडून विविध स्तरावर प्रयत्न झाले; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शिक्षक आपल्या भूमिकेवरून तसूभरही सरकायला तयार नसल्याने अखेर शिक्षण संचालकांनी एक पाऊल मागे घेतले आहे. स्वतंत्र पत्र काढत आता निरक्षरांच्या नोंदणीसाठी शिक्षक त्यांच्याकडे जाणार नाहीत, तर निरक्षरांनीच शाळेत जाऊन नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे आता निरक्षरांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर अभियानाचे यश अवलंबून आहे.

जिल्ह्यात निरक्षर- ३,६२,९०६दोन वर्षांत साक्षर करण्याचे उद्दिष्ट- १८२०४प्रेरकांची गरज - १८२०४दोन वर्षाचे उद्दिष्ट - ४७५४०

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती