शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

बाराखडी शिकायची ? मग तुम्हीच शाळेत जा अन् नोंदणी करा !

By जितेंद्र दखने | Updated: December 6, 2023 20:58 IST

४७ हजारांवर अंगठेबहाद्दर : बहिष्काराने साक्षरता अभियान ठप्प

अमरावती: २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५० हजार नव्हे, तर सुमारे  ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत. केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या नव भारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून या निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख करून देण्यात येणार आहे. मात्र, सर्वेक्षणावरच शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी या अभियानाला गती आली नाही.

शिक्षक सर्वेक्षण करायला तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता शिक्षण संचालकांनीच "बाराखडी शिकायचंय? तर तुम्हीच शाळेत जाऊन नोंदणी करा", अशी साद नागरिकांना घातली आहे, हे विशेष. निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख व्हावी, यासाठी यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून अनेकांना अक्षर ओळखही झाली; मात्र १०० टक्के निरक्षर साक्षर झाले नाहीत. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत.

नव भारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून २०२२ व २०२३ या दोन वर्षांत ४७ हजार ५४० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे हे अभियान पुढे सरकू शकले नाही. शिक्षण विभागाकडून विविध स्तरावर प्रयत्न झाले; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शिक्षक आपल्या भूमिकेवरून तसूभरही सरकायला तयार नसल्याने अखेर शिक्षण संचालकांनी एक पाऊल मागे घेतले आहे. स्वतंत्र पत्र काढत आता निरक्षरांच्या नोंदणीसाठी शिक्षक त्यांच्याकडे जाणार नाहीत, तर निरक्षरांनीच शाळेत जाऊन नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे आता निरक्षरांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर अभियानाचे यश अवलंबून आहे.

जिल्ह्यात निरक्षर- ३,६२,९०६दोन वर्षांत साक्षर करण्याचे उद्दिष्ट- १८२०४प्रेरकांची गरज - १८२०४दोन वर्षाचे उद्दिष्ट - ४७५४०

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती