शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

गावस्तरीय ग्राम दक्षता समित्या निष्क्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या ...

अमरावती : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजनेच्या दृष्टीने ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या बहुतांश गावांत निष्क्रिय असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील कोरोना संदर्भातील उपाययोजना योग्य प्रमाणात राबविल्या जात नाही. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा या समित्या ॲक्टिव्ह करणे गरजेचे वाटू लागले आहे.

शासनादेशाचे आणि सूचनांचे काटेकोर पालन व्हावे, ग्रामीण भागात कोरोना संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व गावातील काही जणांची समितीत नियुक्त करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कोरोना काळात या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली. त्याची दखल घेत समित्यांना शासनाच्या सूचनेप्रमाणे दंडीत करण्याचे अधिकार दिले. त्यातून अनेक जणांवर कारवाईसुध्दा करण्यात आली. त्यामुळे समितीचा चांगला जोम गावोगावी बसला होता. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावात निवडणुकीचे वातावरण होते. सत्ताबदल झाल्याने गाव कारभारी बदलले. दररोज झपाट्याने कोरोना बाधिताची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र ग्राम दक्षता समिती निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाहेरगावाहून, राज्यातून, परदेशातून येणाऱ्यांवर तेवढा वॉच राहिलेला नाही. आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका काम करीत असल्याने ग्राम दक्षता समित्यांचे पदाधिकारी निवांत आहेत. मात्र, अद्याप समितीतील पदाधिकारी व सदस्यांनाही वाटणारा धोका ओळखून आता समितीने नव्या दमाने कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याची गरज आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांनी घ्यावा पुढाकार

जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावातील नवीन सरपंच निवडी मध्यंतरी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गावाच्या कारभाराची सूत्रे गेली आहेत. गावचे सरपंच ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आता नवीन कारभाऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यासाठी पुढाकार घेऊन ग्राम दक्षता समिती ॲक्टिव्ह करणे गरजेचे झाले आहे.