शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

अडीच एकरात बहरली लिंब, सीताफळाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:36 AM

शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.

ठळक मुद्देपाण्याचे नियोजन : निवृत्त प्राचार्याने धरली शेतीची कास; युवा वर्गाने घ्यावी वेगळी पिके

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.अर्जुन गांजरे यांना शेतीची आवड आहे. तथापि, नोकरीमुळे त्यांना शेती करता आली नाही. पण, निवृत्तीनंतर त्यांनी शेतातील अभिनव प्रयोग इतरांसमोर ठेवले आहे. गांजरे यांनी वऱ्हा येथील पाच एकर शेतापैकी अडीच एकरात ५०० लिंबांची थायलंड सीडलेस जातीची आणि ५०० सीताफळाची झाडे लावली. अवघ्या दीड वर्षांतच लिंबांच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागली. पुढल्या वर्षी सीताफळाला फळे येतील, असे गांजरे म्हणाले.झाडाला दीडशेवर लिंबझाडांचे कलम अर्जुन गांजरे यांनी नाशिकहून आणले होते. रासायनिक खतासोबतच त्यांनी सेंद्रिय खताचाही वापर केला. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला. योग्य काळजी घेतल्याने पीकांचा चांगली वाढ झाली. लिंबाच्या एका झाडाला दीडशेहून अधिक लिंबे पाहायला मिळतात. गांजरे यांना या शेतीतून वर्षाला दीड लाखांचा नफा होतो.पाण्याचे नियोजन महत्त्वाचेउन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी असते. तथापि, या हंगामात फळबाग टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण उन्हाळ्यात पाणी कुठून आणणार, हा प्रश्न असतो. मात्र, त्यांच्या शेतात पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा असून, नियोजनही योग्य आहे. त्यामुळे भर उन्हात त्यांची फळबाग बहरली दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरी