शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१०० वर आदिवासींना डायरियाची लागण

By admin | Updated: May 23, 2016 00:14 IST

तालुक्यातील बागलिया येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने १०० वर आदिवासींना शनिवारपासून अतिसाराची लागण झाली आहे.

नरेंद्र जावरे चिखलदरातालुक्यातील बागलिया येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने १०० वर आदिवासींना शनिवारपासून अतिसाराची लागण झाली आहे. त्यापैकी चार गंभीर रूग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे जिल्हा परिषद शाळेत रूग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचाराकरिता रुग्णांना बाहेर पाठविण्यासाठी रविवारी दुपारी आदिवासींनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता त्यांना उपचारासाठी बाहेर पाठविण्यात येत आहे. तहसीलदार किशोर बागडे स्वत: तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात आहे. बागलिया येथे एक हातपंप व विहिरीचे पाणी आदिवासी पिण्यासाठी वापरतात. पाण्याची पातळी खाली गेल्याने विहिरीतील झऱ्यातून पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहे. परिणामी गढूळ पाण्यावर बागलियावासियांना तहान भागवावी लागत आहे. शनिवारी दुपारी ११ वाजतानंतर गावकऱ्यांना अचानक उलटी व शौचाचा त्रास सुरु झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. घराघरातून रुग्ण निघू लागल्याने टेंभ्रुसोडा प्राथमिक आरोग्य केंद्राला गावकऱ्यांनी तशी माहिती दिली.बागलिया येथील लोकसंख्या ७८० इतकी आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता शनिवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य यंत्रणेने दवाखाना सुरु केला.टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस.एस.मरसकोल्हे, रोहन गिते, अमित गिते, अकुंश मानकर या चार डॉक्टरांची चमू रुग्णांवर उपचार करीत असून सुरेंद्र गैलवार, खंडारे, अरविंद पिहुलकर, डाबर, ज्योती साखरे, पट्टे, भोसले, गडिलेवाल आदी आरोग्य कर्मचारी तळ ठोकून आहेत. बागलिया येथील सचिव तायडे गावात राहत नसल्याने दूषित पाण्याचा वापर गावकऱ्यांना करावा लागला. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अतिसारची लागण झाल्याचे आदिवासींचे म्हणणे होते. सचिवावर कारवाईची मागणी त्यांनी केली. दूषित पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.हे आहेत अतिसाराचे रुग्णराखी धांडेकर (१६), मालती धांडेकर (१८), रोहिणी बेलसरे ११, दिनेश धांडेकर २३, पार्वती भास्कर ४५, फुलवंती धिकार ३०, रिचाय धिकार २ वर्ष, संतोष शेलेकर, ६ वर्ष, पूनम बेलसरे १९, रामकली बेलसरे २८, शारदा तोटे २९, माणिकराव भास्कर २७, तुळशीराम भास्कर ४५, फुलकाय कास्देकर ४५, रिता मावस्कर २२, विलास बेलसरे १७, मनकू मावस्कर २२, बबिता मावस्कर २०, आेंकार बेलसरे ६५, शांता शेलूकर २५, प्रभू मावस्करगावकऱ्यांनी केला रस्ता रोकोशनिवारी सकाळी ११ वाजतापासून बागलिया येथे अतिसाराची लागण झाली असताना रविवारी दुपारपर्यंत रुग्णांच्या संख्येत सारखी वाढ होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी रुग्णांना पुढील उपचारासाठी 'रेफर' करण्याची मागणी रेटून धरली व या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. प्रशासनाच्यावतीने तहसीलदार किशोर बागडे यांनी त्याची दखल घेत बागलिया येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.चार रुग्ण रेफरबागलिया येथे शंभरावर डायरियाचे रुग्ण असताना गंभीर चार रुग्णांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये बबीता मुन्ना मावस्कर (२०), शांता सुनील सेलुकर (२५), ओंकार मनसू बेलसरे (३५) आणि शिनू दहीकर (७०) या वृद्धेचा समावेश असून आदिवासी संघटनेचे महादेव कास्देकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल, सरपंच झिंगू धांडे, उपसरपंच मुंगीलाल कास्देकर आदी गावकऱ्यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु होते.