शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २०१ गावे तहानलेली; सात टँकरने पुरवठा, ९५ विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: May 10, 2015 23:54 IST

पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प ...

अमरावती : पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक गावांतील जलस्त्रोतांनी तळ गाठला असल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील २०१ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाव्दारा ९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७ टँंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थिती चिखलदरा तालुक्यामधील ढोमणीफाटा व खडीमल गावात प्रत्येकी एक टँकर व चांदूररेल्वे तालुक्यामधील घुईखेड येथे ४ असे ७ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०१ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये सर्वाधिक ४८ गावे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती ३२, भातकुली १२, तिवसा ९, मोर्शी ८, वरुड ८, चांदूररेल्वे २१, धामणगाव रेल्वे २५, अचलपूर २८, चांदूरबाजार ३, अंजनगाव सुर्जी ५, दर्यापूर १, धारणी ८ व चिखलदरा तालुक्यांतील १३ गावे आहेत. जिल्ह्यात ९५ विहिरींचे अधिग्रहण एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये २४ विहिरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती १७, भातकुली १, तिवसा ८, मोर्शी ४, वरुड १५, चांदूररेल्वे १९, धामणगाव रेल्वे ५, चांदूरबाजार १ व चिखलदरा तालुक्यात १ विहीर अधिग्रहित करण्यात येणार आहे. यावर ३२ लाख ७७ हजार निधीची तरतूद आहे. (प्रतिनिधी)४४ नळयोजनांची विशेष दुरुस्तीपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात ४४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७ योजना, नांदगाव ८, भातकुली ८, तिवसा २, मोर्शी ४, वरुड ३, चांदूररेल्वे २, धामणगाव रेल्वे १, अचलपूर ३, चांदूरबाजार १ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५ योजना आहेत. यावर २ कोटी ५९ हजार निधीची तरतूद आहे. १११ नवीन विंधन विहिरीपाणीटंचाई कृती आराखड्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात १११ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३१ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे. अमरावती २०, भातकुली ४, तिवसा ४, मोर्शी ४, चांदूररेल्वे ४ व धामणगाव तालुक्यात २६ आहेत. यावर ७२ लाख १८ हजारांच्या निधीची तरतूद आहे.३ कोटी ३४ हजारांच्या निधीची तरतूदएप्रिल ते जूनदरम्यान करण्यात येणाऱ्या पाणीटंचाईच्या कामावर ३ कोटी ३४ लाखा ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक भातकुली तालुक्यात ७३ लाख १४ हजार, अमरावती ५७ लाख ९५ हजार, नांदगाव ५२ लाख, तिवसा ७ लाख ४५ हजार, मोर्शी १७ लाख ९० हजार, वरुड १५ लाख २५ हजार, चांदूररेल्वे १८ लाख ६५ हजार, धामणगाव २५ लाख, अचलपूर १२ लाख ३० हजार, चांदूरबाजार ११ लाख ८ हजार, अंजनगाव १४ लाख ५० हजार, दर्यापूर १ लाख ६० हजार, धारणी १० लाख, चिखलदरा १७ लाख २० हजारांची तरतूद आहे.