शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ चार संकुल ताब्यात घेणार

By admin | Updated: June 6, 2015 01:17 IST

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारलेले चार संकुल करारनामे संपण्यापूर्वीच ताब्यात

बीओटी कंत्राटदाराची मुस्कटदाबी : आमसभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचालीअमरावती : बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर साकारलेले चार संकुल करारनामे संपण्यापूर्वीच ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. बीओटी कंत्राटदारांनी चालविलेल्या नियमबाह्य कामांना लगाम लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्याअनुषंगाने येत्या आमसभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू आहे.स्थानिक जवाहर गेटनजीकचे खत्री कॉम्प्लेक्स, महापालिका इमारत परिसरातील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस व दादासाहेब खापर्डे संकुल तर जयस्तंभ चौकातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे संकुल महापालिका प्रशासनाने बीओटीवर साकारले असून या चारही संकुलांचे करारनामे हे सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे; तथापि दादासाहेब खापर्डे व खत्री कॉम्प्लेक्सच्या बीओटी कंत्राटदाराने प्रशासनाला विश्वासात न घेता काही गाळेधारकांशी परस्पर करारनामे केल्याचे बाजार व परवाना विभागाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असताना कंत्राटदारांनी परस्पर करारनामे करुन लाखो रुपयांना गाळे विकण्याचा सपाटा चालविला आहे.याप्रकरणी उपायुक्त चंदन पाटील हे लक्ष ठेवून आहेत. परंतु महापालिका उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने या चारही संकुलाचे करार संपण्यापूर्वीच ते ताब्यात घेण्यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करणे आवश्यक आहे. गाळे वाटपासाठी काढणार निविदा४बीओटी तत्त्वावरील हे चारही संकुल ताब्यात घेतल्यानंतर महापालिका या संकुलात गाळे वाटपासाठी खुल्या निविदा काढून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये गाळे वाटप निविदामधून येतील. तसेच या संकुलात होत असलेल्या गैरव्यवहाराला आळादेखील बसवता येईल.ही आहेत बीओटीची चार संकु ले४सन २०१८ मध्ये बीओेटी तत्त्वावरील करारनामे संपणारी ही चार संकुले आहेत. यात खत्री कॉम्प्लेक्स, प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुल, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस संकुल व दादासाहेब खापर्डे संकुलाचा समावेश आहे.जुन्या करारनाम्यानुसार अटी, शर्थीचे उल्लंघन झाल्यास संकुल करार संपण्यापूर्वी ताब्यात घेता येते. सर्वसाधारण सभा, आयुक्तांची मान्यता आवश्यक राहील. सद्या या विषयी काही बोलणे संयुक्तिक नाही. - चंदन पाटील, उपायुक्त, महापालिका.बीओटी संकुलात उघडकीस आलेल्या गैरव्यवहाराने प्रशासनाची नामुष्की झाली आहे. या चार संकुलाचे करारानामे संपायला दोन ते अडीच वर्षे शिल्लक आहे. मात्र उत्पन्नवाढीसाठी निर्णय योग्य राहील.- विलास इंगोले, सभापती, स्थायी समिती.करार संपण्यापूर्वी गाळेधारकांना संकुलातून बाहेर काढणे योग्य नाही. नव्याने अटी, शर्थी लादून त्याच दुकानदारांना न्याय मिळावा, असे धोरण निश्चित करावे. अन्यथा न्यायालयात धाव घेऊ. - अजय मिराणी, गाळेधारक.