शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

१२८ बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होतील बदल्या; अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले एकाच जिल्ह्यात

By गणेश वासनिक | Updated: April 21, 2024 13:18 IST

एकाच जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या; आरएफओंच्या मंत्रालयात येरझारा

अमरावती : राज्यातील बदली पात्र १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलींचे सूत्र मंत्रालयातून हलणार असल्याने अनेक वनाधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावताना दिसत आहे. एकाच वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय बदल्याची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्यांना यावेळेस मात्र बाहेर पडावे लागेल, असे एकंदरीत चित्र आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी वनमंत्रालयाने स्वत:कडे घेतलेले आहेत. यामुळे मुख्य वनसंरक्षकांचे बदलींचे अधिकार संपुष्टात आले असून लागेबांधे ठेवत जिल्ह्यात राहणाऱ्या काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गोची झालेली आहे. शासन निर्णयानुसार यापुढे सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन्यजीव, कार्य आयोजना असा बदली प्रवास करावा लागेल. शिवाय तीन वर्षांच्यावर एकाच ठिकाणी थांबता येणार नाही, कारण आरएफओंचे पद हे राज्यस्तरीय असल्यामुळे बदल्यांचा निकष राज्यस्तरीय लावण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्हा बदल होणार आता या निर्णयावरून स्पष्ट झालेले आहेत. कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्यानंतर प्रशासकीय धोरणात शिथिलता येऊन ३१ मे पर्यंत राज्यातील १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटणार हे निश्चित झाले आहे.

मंत्रालयात जोरदार फिल्डिंग१२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली यादी १५ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक वनाधिकारी मार्च एंडींगनंतर सक्रिय झालेले आहे. मंत्रालयात सध्या वनसचिव उत्तराखंडमध्ये प्रशिक्षणावर असून ते २९ एप्रिलपासून मंत्रालयात विराजमान होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील काही आरएफओ आपापल्या परीने भेटीगाठी कोणी जागा मिळवायची ही सोय तयारी करण्याठी मंत्रालय गाठत आहेत. राज्यातील ७५ च्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी मंत्रालयाच्या पायरीचे दर्शन करून परतल्याची माहिती आहे.

एकाच जागी ठाण मांडून बसलेतगेल्या ४ वर्षांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या वनप्रशासनाकडे आलेल्या आहेत. मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या वनाधिकाऱ्याशी लागेबांधे असणारे आरएफओ जिल्ह्यात अर्धी अधिक नोकरी करत आहेत. कधी सामाजिक वनीकरणनंतर प्रादेशिक असा बदली प्रवास सध्या सुरू आहेत. जिल्ह्यात राहण्याकरिता लक्ष्मी दर्शन दाखविण्याची प्रथा असल्याने १२८ च्या बदली यादीत १०० च्या जवळ वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग ३ प्रमाणे बदल्या करताना दिसून येतात. बनावट कारणे आणि लाखो रुपयांची उलाढाल यामुळे अनेकांना जिल्ह्यात राहतात येते अशी स्थिती आरएफओंच्या बदल्यांमध्ये यास आता मात्र ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Transferबदली