शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

थॅलेसेमियाग्रस्तांचे जीवन रक्तावर अवलंबून

By admin | Updated: May 8, 2017 00:14 IST

थॅलेसेमिया हे आनुवंशिक आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण अस्थिर असते.

इंदल चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : थॅलेसेमिया हे आनुवंशिक आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण अस्थिर असते. हिमोग्लोबीनमधील अल्फा व बिटा चेनच्या रचनेत दोष असतो. त्यामुळे लाल रक्तपेशींचा लवकर नाश होतो. परिणामी हिमोग्लोबीन कमी होतो. अशा रुग्णांना वारंवार संक्रमण करावे लागते. लक्षणेवयाच्या ३ ते ६ महिन्यांपासून दिसू लागते. बाळाचे हिमोग्लोबी तीव्रतेने कमी होणे, सतत भूक लागणे, उलट्या, जुलाब होणे, जंतूसंसर्ग होणे, शरिराची वाढ खुंटणे, सतत आजारी राहणे ही थॅलेसेमिया आजाराची लक्षणे आहेत.उपचाररुग्णांना दर ४ ते ६ आठवड्यांनी वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. यामुळे अशा रुग्णांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते, ते स्थिर ठेवण्यासाठी औषधी घ्यावी लागते, असे डे केअर युनिट हिमॉटॉलॉजी विभागाचे अधिकारी मनोज सहारे यांनी सांगितले. पती-पत्नी थॅलेसेमिया मायनर असल्यास हे कराअसे रुग्ण पूर्णपणे निरोगी असतात. परंतु पती-पत्नी दोघेही थॅलेसेमिया मायनर असतील तर त्यांच्या बाळांना थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता असते. तेव्हा पत्नीला गर्भधारणा झाल्यास त्यास्थितीत ८ ते १२ आठवड्यापर्यंत गर्भाची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामध्ये जर बाळ थॅलेसेमिया मेजरग्रस्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करावे. ही तपासणी मुंबईच्या केईएम हॉस्टिपटमध्ये केली जाते. या आजारावर मुळातून उपचार करण्यासाठी "बोनमॅरो ट्रान्सप्लांट" ही प्रक्रिया केली जाते. परंतु ही प्रक्रिया महागडी असल्याने अनेक रुग्ण ती करू शकत नाही. मात्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारावर मोफत उपचार केला जातो. त्यामुळे येथे विविध जिल्ह्यातून रुग्ण उपचारार्थ येतात.अशी घ्या काळजीवारंवार रक्त संक्रमण केल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढून रुग्णाला मधुमेह, हृदयरोग होऊ शकतो. रक्तपेशी लवकर तोडण्याचे काम पानथडीमध्ये होते. त्यामुळे त्याचा आकार सामान्य आकारापेक्षा अधिक वाढतो. उंच ठिकाणावर जाणे टाळावे, नियमित आहार घ्यावा, नियमित आराम करावा, पाणी भरपूर प्यावे, नियमित साधारण व्यायाम करावा, हिमोग्लोबीनची नियमित तपासणी करावी, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्यावे.प्रकारथॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत. थॅलेसेमिया मायनर आणि मेजर. थॅलेसेमिया मायनरचे रुग्ण पूर्णपणे निरोगी असतात. त्यांना दैनंदिन जीवनात कुठलीही अडचण नसते. परंतु थॅलेसेमिया मेजरच्या रुग्णांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण अस्थिर असते. त्यात लाल पेशी नाश पावतात. त्यामुळे शरीरातील आॅक्सिजनची कमी होऊन रुग्णांना थकवा जाणवतो. त्यामुळे वारंवार रक्त संक्रमण करावे लागते.