शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दहा दिवसांचे अधिवेशन हे तर राज्य शासनाचे अपयश, अशोक चव्हाण यांची परखड टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:21 IST

नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे जाहीर करण्यात आले. सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केलीे. 

अमरावती : नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे जाहीर करण्यात आले. सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केलीे. अमरावती विभागीय काँग्रेस पदाधिका-यांच्या बैठकीला आले असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. खा. चव्हाण यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, सामान्य माणूस हतबल झाला आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज, दरदिवसाला नवीन जीआर, सोयाबीन व कापूस खरेदीत गोंधळ, भारनियमन, आयटीत घोळ अन् सचिवांची बदली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असे एक ना अनेक समस्या, प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य शासनाने गत तीन वर्षांत काय केले, याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसने भव्य मोर्चाचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरोगामी विचारसरणीचे पक्ष या मोर्चात सामील होणार असून, गुलाम नबी आझाद त्याचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चाचे राहुल गांधींना निमंत्रण देण्यात आले आहे; परंतु ते गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विरोधक गोंधळ घालतात म्हणून हिवाळी अधिवेशन १० दिवस चालेल, असे जाहीर केले. अधिवेशनात प्रश्न मांडणे म्हणजे गोंधळ घालणे नव्हे. भाजप विरोधात असताना त्यांनी नेमके काय केले, असा सवाल खा. चव्हाणांनी उपस्थित केला. खरे तर भाजपला राज्य सरकार चालविता येत नाही. तीन वर्षांतच बट्ट्याबोळ झाला. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. याबाबत अधिवेशनात ठोस आश्वासन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, अधिवेशन किमान तीन आठवडे न चालविता अल्पावधीत चालविणे ही सरकारची पळपुटी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आदी उपस्थित होते.

राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड लोकशाही मार्गानेचराहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही घराणेशाही  असल्याचा आरोप भाजपचे शाहनवाज हुसेन यांनी केला आहे. त्यावर खा. अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांची लोकशाही मार्गानेच अध्यक्षपदी निवड होणार आहे. ज्यांना कुणाला काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायचे असेल, त्यांनी लोकशाही प्रक्रियेतून पुढे यावे. तसेही शाहनवाज हुसेन यांचा काँग्रेसशी काय संबंध? त्यांनी ‘पब्लिसीटी’साठी हा मुद्दा उपस्थित केला आहे. 

... म्हणून तर पंतप्रधानांना ५० सभा घ्याव्या लागतातगुजरातमध्ये लोकांना बदल हवा असून, राहुल गांधीच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत आहे. गुजरात जर भाजपचा गड आहे, तर विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० सभा का घ्याव्या लागतात, हादेखील प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री येथे ठिय्या मांडून असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAmravatiअमरावती