शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या तृष्णातृप्तीसाठी टँकरने पाणीपुरवठा

By गणेश वासनिक | Updated: June 21, 2023 15:20 IST

नैसर्गिक पाणवठे कोरडे; कृत्रिम पाणवठ्यांवर वन्यजीवांची भिस्त, मृग नक्षत्र लांबल्याचा परिणाम

गणेश वासनिक

अमरावती : पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह पशुपक्ष्यांनाही लागली आहे. सूर्य मेपासून आग ओकत असल्यामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अशातच मृग नक्षत्र लांबणीवर पडल्याने विदर्भात व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. परिणामी, पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी सोडून वाघांसह इतर वन्यजीवांची तहान भागवावी लागत आहे.

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा व बोर अभयारण्य या विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांसह पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्यात वाघांच्या तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. यंदा मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे जंगलात पाण्याची कमतरता जाणवली नाही. मात्र, मे महिन्यात तप्त उन्हामुळे पाणवठ्यातील पाणी आटले आहे. त्यामुळे वाघांसह अन्य वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत सारखीच परिस्थिती आहे. नैसर्गिक पाणवठे आटल्याने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.

वाघांचा शिकारीसाठी १५ ते २० किमीचा प्रवास

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, वन्यजीवांना उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. अशातच वाघांना शिकारीसाठी रोज सुमारे १५ ते २० किमीचा प्रवास करावा लागत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यातच बहुतांश नैसर्गिक पाणवठे देखील आटले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या काही भागातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मेपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असून, पाऊस लांबल्यामुळे वन्यजीवांच्या तृष्णातृप्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी नैसर्गिक पाणवठेदेखील आटल्याचे वास्तव आहे.

- मनोजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, क्राइम सेल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :environmentपर्यावरणWaterपाणीwildlifeवन्यजीवforestजंगलAmravatiअमरावती