शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांच्या मदतीचे प्रस्ताव सादर करा

By admin | Updated: August 4, 2014 23:29 IST

र्णा, चारघड व शहानूर नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त शेती, घरांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदतीचे वाटप करावे. बाधित गावांना शासनाकडून पूर्णत: मदत दिली जाईल.

आढावा बैठक : पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रस्ताव अमरावती : पूर्णा, चारघड व शहानूर नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त शेती, घरांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदतीचे वाटप करावे. बाधित गावांना शासनाकडून पूर्णत: मदत दिली जाईल. जिल्ह्यातील प्रलंबित विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. यासाठी आवश्यक मदतीचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आ. रवी राणा, जि.प अध्यक्ष सुरेखा ठाकरे, प्रभारी विभागीय आयुक्त माधव चिमाजी, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त अरूण डोंगरे, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, विभागीय कृषी सहसंचालक शु.रा. सरदार, उपायुक्त रवींद्र ठाकरे, व्ही.बी काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनील भंडारी आदींची उपस्थिती होती. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या संत्रा फळ पिकांच्या नुकसानीबाबत प्रती झाडाप्रमाणे मदत देण्याचा विशेष प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात या बैठकीत देण्यात आल्या. यावेळी पवार म्हणाले की, पुरामुळे शेती पीक वाहून गेलेल्या, खरडून गेलेल्या आणि पेरणीच न होऊ शकलेल्या शेतजमिनीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत केली जाईल. याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसित गावांमध्ये शासन निणर्यानुसार नागरी सुविधा निर्माण करण्यात याव्यात. तसेच २००७ च्या महापुराने बाधित गावांच्या पुनर्वसनाची कारवाई त्वरित पूर्ण करावी. नाविण्यपूर्ण योजनेच्या निधीतून शाळांमध्ये डेस्क-बेंच घेण्याचेही त्यांनी आदेशित केले. इतर नुकसानीची तातडीने चौकशी करण्याचेही त्यांनी सांगितले. पूर्णा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे झालेल्या वित्त व जिवितहानीस जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. यानुसार लवकरच पंचनाम्यांची कारवाई सुरू होईल.