शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शेतकऱ्यांच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे पेरणीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:22 IST

क्षेत्रीय स्तरावरून पेरणीची अचूक माहिती येणे, या प्रक्रियेत शेतकºयांचा सहभाग वाढविणे व डेटा संकलीत करतांना पारदर्शकता येणे यासाठी आता मोबाईल अ‍ॅपचा वापर शेतकरी करणार आहे. सहा विभागातील सहा तालुक्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट : अचलपूर तालुक्यात १८५ गावांतील ५४,६३८ खातेदारांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्षेत्रीय स्तरावरून पेरणीची अचूक माहिती येणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे व डेटा संकलीत करतांना पारदर्शकता येणे यासाठी आता मोबाईल अ‍ॅपचा वापर शेतकरी करणार आहे. सहा विभागातील सहा तालुक्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अमरावती विभागात अचलपूर तालुक्याची या प्रकल्पासाठी निवड झाल्याने १८५ गावातील ५४ हजार ६३८ शेतकरी खातेदार या अद्ययावत प्रणालीचा वापर करणार आहे.पीक अहवाल प्रक्रियेत शेतकºयांचा सहभाग वाढल्यास कृषी पतपुरवठा करणे सुलभ होणार आहे. पीक विमा अणि पीक कापणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकºयांनी पीक पेरणीची माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारा नाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी टाटा ट्रस्ट द्वारा एक आज्ञावली (फार्मर फे्रंडली अ‍ॅप) विकसित केलेले आहे. या पद्धतीचा पहिला अवलंब पालघर जिल्ह्यातील करंजपाडा या गावात करण्यात आला. प्रायोगीक तत्वावरील या प्रकल्पाला उत्सुक शेतकºयांनी या आज्ञावलीची स्थापना करून पीक अहवालाची ही नवी पद्धत उत्साहाने स्वीकारली.शेतकऱ्यांजवळ मोबाईल नसल्यास ‘नो प्राब्लेम’शेतकºयांना त्यांच्या मोबाईल किंवा याकामी वापरात येणारा कोणताही स्मार्ट फोन नंबरची तलाठ्याकडे आगाऊ नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्याकडे स्मार्ट फोन नसल्यास साध्या मोबाईलद्वारे आपल्या शेतातील पिकांचा तपशील ‘एसएमएस’द्वारे प्रणालीमध्ये अपलोड करावा लागणार आहे. जर शेतकऱ्याकडे मोबाईलच नाही किंवा तशी व्यवस्था करू शकत नाही, त्यांनी तलाठ्याकडे उपलब्ध असलेल्या स्मार्ट फोन किंवा टॅबलेटचा वापर करून आपल्या पिकाचा तपशील अपलोड करावा लागणार आहे.अशी होणार प्रकल्पाची अंलबजावणीशेतकºयांच्या मोबाईलमध्ये टाटा ट्रस्टच्या टीमद्वारे अ‍ॅपची स्थापना करण्यात येईल. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांदरम्यान शेतातील उगवण पीकनिहाय छायाचित्रासह पहिली नोंद प्रणालीमध्ये अपलोड करावी. त्यानंतर हंगाम संपेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतातील उभ्या पिकांची नोंद अ‍ॅपमध्ये करावी लागणार आहे. नैसर्र्गिक आपत्ती या सदरात अतिवृष्टी, पूर गारपीट, वादळ, दुष्काळ आदी नुकसानाची माहिती प्रणालीमध्ये हा डेटा अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर शेतकºयांच्या मोबाईल नंबरसह हा डाटा स्वयंमुद्रित करण्यात येऊन विश्लेषणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :MobileमोबाइलFarmerशेतकरी