शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नाथजोगींच्या चेहऱ्यावर हास्य

By admin | Updated: January 9, 2017 00:18 IST

कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन कंठत अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या नांदगाव तालुक्यातील...

अंत्योदय योजना : २८ वर्षांनंतर पुरवठा विभागाने दिला आधारमनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरकुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन कंठत अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या नांदगाव तालुक्यातील हिवरा मुरादे येथील ४० नाथजोगी समाजाच्या कुटुंबीयांच्या जीवनात २८ वर्षांनंतर अंधारलेल्या वाटेत उजेड निर्माण झाला. ही किमया घडवून आणण्यात पुरवठा निरीक्षक गजानन भेंडेकर यांची फार मोठी मोलाची साथ लाभली. पुरवठा विभागाने अंत्योदयचा आधार दिल्याने नाथजोगी कुटुंबीयांचा उपजिविकेचा फार मोठा प्रश्न सुटला.हिवरा मुरादे येथे वास्तव्यास असलेल्या नाथजोगी कुटुंबीयांची स्थिती फार विदारक आहे. कुटुंबीयांच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी या नाथजोगी कुटुंबीयांमधील कर्ता पुरुष वणवण भटकंती करतो, तर या कुटुंबामधील महिला गवताची पेंडी गोळा करतात, तेव्हा कुठे रात्रीची चूल पेटते. या नाथजोगी कुटुंबीयांकडे अद्यापपर्यंत आधारकार्ड नाही. राशन कार्ड नाही. फक्त मतदानाचा हक्क बजावण्यापुरते मतदान कार्ड यांचेकडे आहेत. अद्यापपर्यंत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही. राजकारणासाठी मतदानापुरतेच नाथजोगी कुटुंबीयांच्या वस्तीचा वापर झाला आहे. अद्यापही या वस्तीतील चुली उघड्यावरच पेटते आहे. परंतु हे विदारक दृश्य कुणाच्याही नजरेस येऊ नये, ही शोकांतिका आहे. या वस्तीत विद्युत पुरवठा नाही, पाण्याची व्यवस्थाही नाही, ये-जा करताना चिखलातून वाट काढावी लागते, साधे रस्तेसुद्धा नाहीत. या वस्तीतील नागरिकांना शिक्षणाचा साधा गंधही नाही. ४० ते ५० लहान मुले या वस्तीत आहेत. त्यापैकी फक्त ५ मुले शाळेत जातात. या वस्तीतील कुठलाही व्यक्ती शिक्षित नसल्याने फार मोठ्या अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. शिक्षण महर्षींच्या तालुक्यात वास्तव्यास असतानासुद्धा या वस्तीतील मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते, हे न सुटणारे कोडेच आहे. फार मोठ्या समस्येच्या विळख्याने या वस्तीला घेरले असताना उपजीविकेसाठी आवश्यक असणारे शासकीय स्वस्त धान्य २८ वर्षांनंतर का होईना पण, उपजिविकेचा प्रश्न अधिक प्रमाणात मिटल्याचा खरा आनंद नाथजोगी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत आहे. पुरवठा विभागाने दारिद्र्याच्या बहुपाशात अडकलेल्या या वस्तीचा शोध घेत या नागरिकांच्या वस्तीत जाऊन अंत्योदय कार्डाचे वाटप केले. यामध्ये ईश्वर मांडवकर, धरमनाथ मांडवकर, उमेश मांडवकर, हिंमत मांडवकर, लक्ष्मण मांडवकर, रामराव शिंदे, बाळू पवार, संजय पवार, राजेश तांबुळकर, प्यारेलाल पवार, नारायण मांडवकर, अजाब शिंदे, अंबादास मांडवकर, किसन सनिशे, सुरेश मांडवकर, पंजाब शिंदे, राजेश शिंदे, सुभाष शिंदे, गौकर्णा शिंदे, गणेश मांडवकर, भाऊराव मांडवकर, नारायण तांबे, संतोष पवार, रामराव शिंदे, भगवान तांबुळकर, गणेश तांबूळकर, भाऊराव शिंदे, सुनील पवार, अनिल मांडवकर, भगवान मांडवकर, पांडुरंग मांडवकर, सागर पवार, कांता पवार, सुरेश पवार, माया शिंदे, जगन्नाथ शिंदे, रमेश मांडवकर या नागरिकांना अंत्योदयचा लाभ मिळणार आहे. अन्नाचा कण आमच्या पोटात जाणे हीच आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे, असे या वस्तीतील नागरिकांनी सांगितले. अंधाच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू पुरवठा विभागाचे अधिकारी आपल्या वस्तीत आले असताना जीवन जगण्यास आधार दिला, असे शब्द कानी पडताच अंध उमेश मांडवकरच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले व साहेब तुमचे आभार, असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. तसेच ५० वर्षांपासून शाहिरी करीत समाजप्रबोधन करणारा शाही बाळू शंकर पवार याच वस्तीतील असून एकीकडे अंत्योदयचा लाभ मिळाल्याचा आनंद या शाहिराला झाला, तर दुसरीकडे निवाऱ्याअभावी जीवन जगताना वस्तीतील नागरिकांची होत असलेल्या अवहेलनाबाबत खंत व्यक्त करताना या शाहिराची वाणीही स्तब्ध झाली. पुरवठा निरीक्षक भारावलेजिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व पुरवठा विभागातील माझे सहकारी या सर्वांच्या सहकार्यामुळेच खऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देता आला, अशी प्रतिक्रिया तालुका पुरवठा निरीक्षक गजानन भेंडेकर यांनी दिली. या सामाजिक उपक्रमाने ते भारावले.