शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 16:24 IST

Amravati : तहसील कार्यालयात नागरिकांना दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेल्या कार्यालयात शासकीय दाखले, मालमत्तेची खरेदी-विक्री, शालेय दाखले, शेतशिवाराच्या भानगडी अशा एक ना अनेक कामकाजासाठी शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येरझारा घालतात. परंतु, येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथील वॉटर कूलरमधून जंतुजन्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

या जंतुसंसर्गित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याची तहसील प्रशासनाला पुसटशीही कल्पना नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाची ही अनभिज्ञता सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासकीय कामकाजानिमित्त येणाऱ्या गोरगरीब आबालवृद्धांना पिण्यासाठी येथे वॉटर कूलर लावण्यात आले आहे. परंतु, ज्या टाकीतून वॉटर कूलरला पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, त्या पाण्याच्या टाक्या झाकणविरहित असून, त्यामध्ये तुडुंब जलचर वनस्पती तथा जीवजंतू साचले आहे. तहसील कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित झाले तेव्हापासून त्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली नसून, याबाबत तहसील प्रशासनाने कधी गांभीर्यच दाखविले नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भऊ शकते.

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था तहसील कार्यालयात असलेल्या स्वच्छतागृहांपैकी अर्धेअधिक कुलूपबंद आहेत, तर वापरातील स्वच्छतागृहांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याची दुर्गंधी तहसील कार्यालयाच्या आवारात पसरते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र वॉटर कॅनविशेष म्हणजे, येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी कधीच वॉटर कूलरचे पाणी पित नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक दालनात शुद्ध वॉटर कॅनची सोय आहे.

'लोकमत'ने शोधले वास्तवतहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिक पीत असलेले पाणी दूषित व जंतुजन्य असल्याचा संशय येताच लोकमतने पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तेव्हा शेवाळयुक्त व घाण साचलेल्या पाण्याच्या उघड्या टाक्या निदर्शनास आल्या.

पावसाळ्यात धोकापावसाळ्यात पाण्यात जंतुजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्वच्छ व उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मेंटेनन्स निधी जातो कुठे?स्थानिक कार्यालयातील नियमित नियोजनासाठी तहसील कार्यालयाला निधी प्राप्त होतो. हा निधी नेमका कुठे खर्च होतो, अशी विचारणा टाक्यांच्या स्थितीवरून केली जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती