शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

साहेब, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 16:24 IST

Amravati : तहसील कार्यालयात नागरिकांना दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेल्या कार्यालयात शासकीय दाखले, मालमत्तेची खरेदी-विक्री, शालेय दाखले, शेतशिवाराच्या भानगडी अशा एक ना अनेक कामकाजासाठी शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येरझारा घालतात. परंतु, येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथील वॉटर कूलरमधून जंतुजन्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

या जंतुसंसर्गित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याची तहसील प्रशासनाला पुसटशीही कल्पना नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाची ही अनभिज्ञता सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासकीय कामकाजानिमित्त येणाऱ्या गोरगरीब आबालवृद्धांना पिण्यासाठी येथे वॉटर कूलर लावण्यात आले आहे. परंतु, ज्या टाकीतून वॉटर कूलरला पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, त्या पाण्याच्या टाक्या झाकणविरहित असून, त्यामध्ये तुडुंब जलचर वनस्पती तथा जीवजंतू साचले आहे. तहसील कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित झाले तेव्हापासून त्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली नसून, याबाबत तहसील प्रशासनाने कधी गांभीर्यच दाखविले नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भऊ शकते.

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था तहसील कार्यालयात असलेल्या स्वच्छतागृहांपैकी अर्धेअधिक कुलूपबंद आहेत, तर वापरातील स्वच्छतागृहांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याची दुर्गंधी तहसील कार्यालयाच्या आवारात पसरते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र वॉटर कॅनविशेष म्हणजे, येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी कधीच वॉटर कूलरचे पाणी पित नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक दालनात शुद्ध वॉटर कॅनची सोय आहे.

'लोकमत'ने शोधले वास्तवतहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिक पीत असलेले पाणी दूषित व जंतुजन्य असल्याचा संशय येताच लोकमतने पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तेव्हा शेवाळयुक्त व घाण साचलेल्या पाण्याच्या उघड्या टाक्या निदर्शनास आल्या.

पावसाळ्यात धोकापावसाळ्यात पाण्यात जंतुजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्वच्छ व उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मेंटेनन्स निधी जातो कुठे?स्थानिक कार्यालयातील नियमित नियोजनासाठी तहसील कार्यालयाला निधी प्राप्त होतो. हा निधी नेमका कुठे खर्च होतो, अशी विचारणा टाक्यांच्या स्थितीवरून केली जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती