शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

धक्कादायक! मेळघाटात दूषित पाण्याने दोघांचा मृत्यू, शंभरहुन अधिक आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 18:22 IST

मागील चार दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्देपाचडोंगरी, कोयलारी गावात अतिसाराची लागण

चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पाचडोंगरी व कोयलारी येथे दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा अधिक आदिवासींना लागण झाल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे.

रुग्णांवर काटकुंभ आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालय व गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा कारभार उघड झाला आहे.

गंगाराम नंदराम धिकार (२५), सविता सहदेव अखंडे (३०), अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजेदरम्यान चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉ. साहेबराव धुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची ३० जणांची चमू उपचार करीत आहे.

चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित

मागील चार दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. पाचडोंगरी येथील नागरिकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील खासगी विहिरीतून पाणी भरले. ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्धिकरण न करता वापरले. त्यामुळे संपूर्ण गावात अतिसाराची लागण झाली. सायंकाळपासूनच गावात उलटी, हगवणची साथ सुरू झाली.

म्हणे यंत्रणा सज्ज, ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते!

पावसाळ्यात संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आजाराने आदिवासी नागरिकांसह कुपोषित बालकांचा जीव धोक्यात येतो. गत महिन्यात खंडित विद्युत पुरवठा व त्याचे दुष्परिणाम यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाशित केले होते. मध्य प्रदेशच्या भैसदेही येथून जारिदा सब स्टेशनला पुरवठा केला जातो.

दूषित पाण्यामुळे लागण झाल्याचे प्राथमिक पुढे आले आहे. गावातच कॅम्प उघडला असून, काटकोन चुरणी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याचे नागरिकांनी सांगितले. दोघांचा मृत्यू झाला आहे

सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी चिखलदरा

चार दिवसांपूर्वी आपली पाचडोंगरी ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती झाली. विद्युत पुरवठा खंडित आहे. ब्लिचिंग पावडरसुद्धा आणले आहे. खासगी विहिरीतून पाणी वरून वाहत जात असल्याने हा प्रकार घडला असावा.

व्ही. व्ही. सोळंके, ग्रामसेवक, पाचडोंगरी ग्रामपंचायत

ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळ करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा.

पीयूष मालवीय, सदस्य रुग्ण कल्याण समिती, मेळघाट

पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश असताना दूषित पाणीपुरवठा आदिवासींच्या जिवावर उठला आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे

सहदेव बेलकर, अध्यक्ष काँग्रेस मेळघाट

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावतीChikhaldaraचिखलदराWaterपाणीDeathमृत्यू