शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

धक्कादायक! मेळघाटात दूषित पाण्याने दोघांचा मृत्यू, शंभरहुन अधिक आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 18:22 IST

मागील चार दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्देपाचडोंगरी, कोयलारी गावात अतिसाराची लागण

चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पाचडोंगरी व कोयलारी येथे दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा अधिक आदिवासींना लागण झाल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे.

रुग्णांवर काटकुंभ आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालय व गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा कारभार उघड झाला आहे.

गंगाराम नंदराम धिकार (२५), सविता सहदेव अखंडे (३०), अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजेदरम्यान चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉ. साहेबराव धुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची ३० जणांची चमू उपचार करीत आहे.

चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित

मागील चार दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. पाचडोंगरी येथील नागरिकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील खासगी विहिरीतून पाणी भरले. ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्धिकरण न करता वापरले. त्यामुळे संपूर्ण गावात अतिसाराची लागण झाली. सायंकाळपासूनच गावात उलटी, हगवणची साथ सुरू झाली.

म्हणे यंत्रणा सज्ज, ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते!

पावसाळ्यात संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आजाराने आदिवासी नागरिकांसह कुपोषित बालकांचा जीव धोक्यात येतो. गत महिन्यात खंडित विद्युत पुरवठा व त्याचे दुष्परिणाम यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाशित केले होते. मध्य प्रदेशच्या भैसदेही येथून जारिदा सब स्टेशनला पुरवठा केला जातो.

दूषित पाण्यामुळे लागण झाल्याचे प्राथमिक पुढे आले आहे. गावातच कॅम्प उघडला असून, काटकोन चुरणी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याचे नागरिकांनी सांगितले. दोघांचा मृत्यू झाला आहे

सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी चिखलदरा

चार दिवसांपूर्वी आपली पाचडोंगरी ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती झाली. विद्युत पुरवठा खंडित आहे. ब्लिचिंग पावडरसुद्धा आणले आहे. खासगी विहिरीतून पाणी वरून वाहत जात असल्याने हा प्रकार घडला असावा.

व्ही. व्ही. सोळंके, ग्रामसेवक, पाचडोंगरी ग्रामपंचायत

ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळ करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा.

पीयूष मालवीय, सदस्य रुग्ण कल्याण समिती, मेळघाट

पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश असताना दूषित पाणीपुरवठा आदिवासींच्या जिवावर उठला आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे

सहदेव बेलकर, अध्यक्ष काँग्रेस मेळघाट

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावतीChikhaldaraचिखलदराWaterपाणीDeathमृत्यू