शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह

By admin | Updated: April 13, 2017 00:15 IST

शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते.

तळेगावात आनंद : कायद्याचे सावट निवळले, ऐतिहासिक स्पर्धेला संजीवनीतळेगाव दशासर : शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. यानिर्णयामुळे तळेगावच्या शंकरपटास गतवैभव प्राप्त होणार आहे. मागील तीन वर्षांपासून तळेगावचा प्रसिद्ध शंकरपट भरला नसल्याने नैराश्याचे वातावरण होते. विशेष म्हणजे यामुळे शेतीपुरक व्यवसायावरही मोठा परिणाम झाला होता. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तळेगावच्या शंकरपटावर तीन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या निर्णयामुळे बंदी आली होती. येथील शंकरपटाला शंभर वर्षांचा इतिहास आहे. कृषक सुधार मंडळाद्वारे सुरू करण्यात आलेला हा ऐतिहासिक शंकरपट दरवर्षी संक्रातीच्या मुहूर्तावर १५ ते १८ जानेवारीपर्यंत येथील बसस्थानकाच्या उत्तरेस असलेल्या २७ एकर शासकीय जागेत भरविण्यात येतो. देशातील पहिला महिला शंकरपट देखील याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी भरविण्यात आला होता. तेव्हापासून येथील शंकरपटात महिला देखील सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कुस्ती स्पर्धा व पटेश्वर यात्रा देखील भरविली जाते. केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर या शंकरपटाच्या माध्यामतून अनेक शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यावर येथे येणाऱ्यांचा भर असतो. शंकरपटात शेतीपयोगी सर्वच साहित्य, करमणुकीची साधने, बैलबाजार, पशू प्रदर्शनी, बचतगट स्टॉल आदींचा भरणा असल्याने यापटाला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि येथे कोट्यवधींची उलाढालही होते. शासनाने २७ एकर शासकीय जमीन दहा दिवसांसाठी शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमासाठी राखून ठेवली आहे. आ. जगताप यांच्या प्रयत्नाने यात्रेचे उत्पन्न कृषक सुधार मंडळास मिळवून दिले आहे. (वार्ताहर)बैलांवर अन्याय नाहीराज्यातील पटशौकीन आपल्या नामांकित जोड्या घेऊन येथे लवाजाम्यासह डेरेदाखल होतात. तसेच लांबून व्यापारी, ग्राहक व शेतकरी लाखोंच्या संख्येने पटात सहभागी होत असतात. या शंकरपटात बैलांवर कोणताही अन्याय होत नाही व जोडी हाकताना पुराणी, आरू व काठीचा वापर करण्यास धुरकऱ्यास सक्त मनाई कृषक सुधार मंडळाने केली आहे. शंकरपट सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, पटविरोधक सुप्रीम कोर्टात गेल्यास अडचण येऊ नये. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे. - आ.वीरेंद्र जगताप,धामणगावहा पट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचे भूषण आहे. या शंकरपटाला आजपर्यंत कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. - रावसाहेब देशमुख, कृषक सुधार मंडळ