शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

नोटाबंदीनंतरही रोहयोच्या तिजोरीत ठणठणाट

By admin | Published: February 01, 2017 12:06 AM

रोजगार हमी योजनेच्या कामावर लागणाऱ्या साहित्याची देयके अदा करण्यासाठी आलेल्या राज्याच्या खात्यात दोन महिन्यांपासून ठणठणाट आहे.

कामे थांबली : दोन महिन्यांपासून राज्याच्या खात्यात निधीची वानवाअमरावती : रोजगार हमी योजनेच्या कामावर लागणाऱ्या साहित्याची देयके अदा करण्यासाठी आलेल्या राज्याच्या खात्यात दोन महिन्यांपासून ठणठणाट आहे. निधीच नसल्याने बांधकाम साहित्य आणखी किती दिवस उधारीवर घ्यावे, काम कसे पूर्ण करावेत, याविवंचनेत शासनाच्या विविध यंत्रणांवरील वैयक्तिक लाभार्थी आहेत. त्याचा सर्वाधिक फटका घरकूल आणि सिंचन विहीर लाभार्थींना बसत आहे. रोहयोच्या मंजूर कामासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे स्वतंत्र खाते आहे. त्या खात्यात निधी जमा ठेवला जातो. तो निधी कामावर खर्चाच्या देयकानुसार अदा करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना आहेत. मजुरांना मोबदला देण्यासाठी आणि त्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचे देयक अदा करण्यासाठी स्वतंत्र खाती आहेत. त्यापैकी साहित्य म्हणजे, कुशल कामाची देयके अदा करण्यासाठी असलेल्या शासनाच्या खात्यात निधीच जमा झालेला नाही. सिंचन विहिरींची कामे रखडली अमरावती : रोजगार हमी योजनेच्या कामावर लागणारे सिमेंट, लोखंड, वाळू, विटा व इतर साहित्याची देयके स्वतंत्रपणे तयार होते. त्यासाठी केंद्र शासनाकडून हा निधी दिला जातो. मात्र, मजुरीच्या देयकासाठी हा निधी नाही. परिणामी साहित्याच्या देयकासोबतच अकुशल कामाचा मोबदला देण्यासाठी निधी नसल्याने मागील दोन महिन्यांपासून वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांसोबतच साहित्याचा अभाव असल्याने सुरू असलेली सिंचन विहिरीची कामे रखडून पडली आहेत. परिणामी देयके मिळत नसलयाने साहित्य आणि मजुरी कशी अदा करावी, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेसोबतच लाभार्थ्यांना पडला आहे. सिंचन विहिरींसाठी मोठी कसरतरोजगार हमी योजनेतून मंजूर विहिरींच्या कुशल आणि अकुशल कामांची देयके राज्याच्या खात्यातून अदा केली जातात. मात्र, विहिरींच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य कोठून आणावे आणि कुशल कामाचा मोबदला कसा द्यावा, असा पेच निर्माण झाला आहे. सिंचन विहिरींच्या लाभार्थींना एकाचवेळी दोन्ही कामांची देयके मिळणे आवश्यक आहे. मात्र, कुशल व अकुशल या दोन्ही कामांची देयके मिळत नसल्याने काम कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकूल लाभार्थ्यांचा ‘वांधा’शासनाने ग्रामीण भागात मंजूर केलेल्या घरकुलाच्या एकूण अनुदानातील रकमेपैकी वाढीव १८ हजार रुपये मजुरीच्या स्वरुपात लाभार्थी कुटुुंबाला मिळतात. मात्र, घरकुलाचे काम केल्यानंतरच ते दिले जातात. जिल्ह्यातील अनेक घरकूल लाभार्थींनाही रक्कम मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. निधी मिळण्यासाठी राज्यस्तरावरून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. कुशल व अकुशल कामांची देयके अदा करण्यासाठी थोडा अवधी मिळू शकतो. त्याभरवशावर कामे सुरू आहेत.- आर.डी.काळे, उपजिल्हाधिकारी, रोहयो