शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एनएचएम कर्मचाऱ्यांना मिळणार पुनर्नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:21 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी

परिपत्रक धडकले : आदेश देण्याची प्रक्रिया सुरूअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती मिळणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ३ एप्रिलपासून पुढील ११ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशा आशयाचे परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्नियुक्तीबाबतच्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यभरातील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभगात विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल राज्यभरात २२ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सन २०१२ मध्ये या अभियानाचा अवधी पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आला होता. ही मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आल्यानंतर अभियान गुंडाळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी, असे कळविण्यात आले होते. यामुळे या अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरीच्या शाश्वतीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या अभियानाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १एप्रिल २०१७ रोजीच्या सेवाखंड देऊन २ एप्रिल रोजीच्या शासकीय सुटी असल्यामुळे ३ एप्रिल १७ पासून पुढील अकरा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात यावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)७९३ जणांना दिलासा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हाभरात ७९३ अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक)सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवार २७ मार्च रोजी अभियानातील सर्वानांना पुनर्नियुक्ती देण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.