शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

पावसाची उसंत, बिजांकूर करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने ...

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने बिजांकुर करपायला लागले आहे. वाणी आदी कीटक कोवळ्या पिकांचा फडशा पाडत आहे. जमिनीतील आर्द्रता कमी होत असल्याने शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागल्याचे दृश्य शिवारांत दिसून येत आहे. दरम्यान मृगाच्या गाढवाने धोका दिल्याने आर्द्राचा कोल्हा तारणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

जिल्ह्यात वेळेआधी मान्सून पोहोचला असल्याच्या वार्तेने शेतकरी उत्साही होऊन बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली. संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणी कपाशी, सोयाबीनला पाणी देत आहेत. मात्र, जिरायती क्षेत्रात मात्र, निसर्गावर अवलंबून राहावे लागत असल्याने कोवळी पिके माना टाकत आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक पेरण्या झाल्या होत्या. आता पावसाची उसंत असतानाही शेतकरी रिस्क घेत आहे. साधारणपणे २० टक्के क्षेत्रात आजपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६.९८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. सद्यस्थितीत १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २०.४५ टक्केवारी आहे. यामध्ये तिवसा व अंजनगाव या तालुक्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. मात्र, तूर्तास सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. २४ तारखेनंतर पावसात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

९ व ११ जूनला सर्वाधिक पाऊस

जूनच्या २० दिवसांत पावसाचे १५ दिवस राहिले असले तरी १६५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यापैकी ९ जूनला २१ व ११ जूनला ३० मिमी पाऊस झाला. याव्यतिरिक्त अन्य दिवस १ ते १० मिली दरम्यान विखुरता झालेला आहे. सार्वत्रिक पावसाची नोंद दोनच दिवस झालेली आहे. पेरणीयोग्य दमदार पाऊस अद्यापही नसल्याने, या काळात पेरणी करणे जिरायती क्षेत्रासाठी धाडसाचे ठरणार आहे.

बॉक्स

२४ जूननंतर वाढणार पाऊस

जिल्ह्यात २२ पर्यंत एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. दरम्यान या काळात कडक उन्ह राहून वारादेखील राहील. त्यामुळे बास्पीभवन होऊन जमिनीचा पापुद्रा हलका होण्याची शक्यता आहे. बियाणे महाग असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट परवडण्यासारखे नाही. दरम्यान सोयाबीनची १५ जुलैपर्यंत तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

तालुकानिहाय झालेली पेरणी

जिल्ह्यात सद्यस्थितीत धारणी तालुक्यात १, ५९१ हेक्टर, चिखलदरा १,०९४, अमरावती ५,३०५, भातकुली १,५३१, नांदगाव खंडेश्वर १३,५०९, चांदूर रेल्वे, ८,०९३, तिवसा १४,९५९, मोर्शी १२,५१०, वरुड १०,८९३, दर्यापूर ५७२, अंजनगाव सुर्जी १६,६८१, अचलपूर ४,६४०, चांदूर बाजार १२,८९६ व धामणगाव तालुक्यात ३५,८१० अशी एकूण १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

बॉक्स

संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पेरणी करावी, जिरायती क्षेत्रात रिस्क घेणे परवडणारे नाही. त्यामुळे काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी. सोयाबीन १५ जुलैपर्यंत व तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येते.

- विजय चवाळे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी