शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उसंत, बिजांकूर करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने ...

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने बिजांकुर करपायला लागले आहे. वाणी आदी कीटक कोवळ्या पिकांचा फडशा पाडत आहे. जमिनीतील आर्द्रता कमी होत असल्याने शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागल्याचे दृश्य शिवारांत दिसून येत आहे. दरम्यान मृगाच्या गाढवाने धोका दिल्याने आर्द्राचा कोल्हा तारणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

जिल्ह्यात वेळेआधी मान्सून पोहोचला असल्याच्या वार्तेने शेतकरी उत्साही होऊन बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली. संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणी कपाशी, सोयाबीनला पाणी देत आहेत. मात्र, जिरायती क्षेत्रात मात्र, निसर्गावर अवलंबून राहावे लागत असल्याने कोवळी पिके माना टाकत आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक पेरण्या झाल्या होत्या. आता पावसाची उसंत असतानाही शेतकरी रिस्क घेत आहे. साधारणपणे २० टक्के क्षेत्रात आजपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६.९८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. सद्यस्थितीत १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २०.४५ टक्केवारी आहे. यामध्ये तिवसा व अंजनगाव या तालुक्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. मात्र, तूर्तास सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. २४ तारखेनंतर पावसात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

९ व ११ जूनला सर्वाधिक पाऊस

जूनच्या २० दिवसांत पावसाचे १५ दिवस राहिले असले तरी १६५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यापैकी ९ जूनला २१ व ११ जूनला ३० मिमी पाऊस झाला. याव्यतिरिक्त अन्य दिवस १ ते १० मिली दरम्यान विखुरता झालेला आहे. सार्वत्रिक पावसाची नोंद दोनच दिवस झालेली आहे. पेरणीयोग्य दमदार पाऊस अद्यापही नसल्याने, या काळात पेरणी करणे जिरायती क्षेत्रासाठी धाडसाचे ठरणार आहे.

बॉक्स

२४ जूननंतर वाढणार पाऊस

जिल्ह्यात २२ पर्यंत एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. दरम्यान या काळात कडक उन्ह राहून वारादेखील राहील. त्यामुळे बास्पीभवन होऊन जमिनीचा पापुद्रा हलका होण्याची शक्यता आहे. बियाणे महाग असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट परवडण्यासारखे नाही. दरम्यान सोयाबीनची १५ जुलैपर्यंत तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

तालुकानिहाय झालेली पेरणी

जिल्ह्यात सद्यस्थितीत धारणी तालुक्यात १, ५९१ हेक्टर, चिखलदरा १,०९४, अमरावती ५,३०५, भातकुली १,५३१, नांदगाव खंडेश्वर १३,५०९, चांदूर रेल्वे, ८,०९३, तिवसा १४,९५९, मोर्शी १२,५१०, वरुड १०,८९३, दर्यापूर ५७२, अंजनगाव सुर्जी १६,६८१, अचलपूर ४,६४०, चांदूर बाजार १२,८९६ व धामणगाव तालुक्यात ३५,८१० अशी एकूण १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

बॉक्स

संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पेरणी करावी, जिरायती क्षेत्रात रिस्क घेणे परवडणारे नाही. त्यामुळे काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी. सोयाबीन १५ जुलैपर्यंत व तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येते.

- विजय चवाळे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी