शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

पावसाची उसंत, बिजांकूर करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने ...

अमरावती : हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज चुकल्याने पेरणीला घाई केलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. आठवडाभरापासून पावसाची उघडीप असल्याने बिजांकुर करपायला लागले आहे. वाणी आदी कीटक कोवळ्या पिकांचा फडशा पाडत आहे. जमिनीतील आर्द्रता कमी होत असल्याने शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागल्याचे दृश्य शिवारांत दिसून येत आहे. दरम्यान मृगाच्या गाढवाने धोका दिल्याने आर्द्राचा कोल्हा तारणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

जिल्ह्यात वेळेआधी मान्सून पोहोचला असल्याच्या वार्तेने शेतकरी उत्साही होऊन बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली. संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणी कपाशी, सोयाबीनला पाणी देत आहेत. मात्र, जिरायती क्षेत्रात मात्र, निसर्गावर अवलंबून राहावे लागत असल्याने कोवळी पिके माना टाकत आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक पेरण्या झाल्या होत्या. आता पावसाची उसंत असतानाही शेतकरी रिस्क घेत आहे. साधारणपणे २० टक्के क्षेत्रात आजपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६.९८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. सद्यस्थितीत १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २०.४५ टक्केवारी आहे. यामध्ये तिवसा व अंजनगाव या तालुक्यात पेरणीचा टक्का वाढला आहे. मात्र, तूर्तास सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. २४ तारखेनंतर पावसात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

९ व ११ जूनला सर्वाधिक पाऊस

जूनच्या २० दिवसांत पावसाचे १५ दिवस राहिले असले तरी १६५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यापैकी ९ जूनला २१ व ११ जूनला ३० मिमी पाऊस झाला. याव्यतिरिक्त अन्य दिवस १ ते १० मिली दरम्यान विखुरता झालेला आहे. सार्वत्रिक पावसाची नोंद दोनच दिवस झालेली आहे. पेरणीयोग्य दमदार पाऊस अद्यापही नसल्याने, या काळात पेरणी करणे जिरायती क्षेत्रासाठी धाडसाचे ठरणार आहे.

बॉक्स

२४ जूननंतर वाढणार पाऊस

जिल्ह्यात २२ पर्यंत एखाद्या ठिकाणी पाऊस होईल. दरम्यान या काळात कडक उन्ह राहून वारादेखील राहील. त्यामुळे बास्पीभवन होऊन जमिनीचा पापुद्रा हलका होण्याची शक्यता आहे. बियाणे महाग असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट परवडण्यासारखे नाही. दरम्यान सोयाबीनची १५ जुलैपर्यंत तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

तालुकानिहाय झालेली पेरणी

जिल्ह्यात सद्यस्थितीत धारणी तालुक्यात १, ५९१ हेक्टर, चिखलदरा १,०९४, अमरावती ५,३०५, भातकुली १,५३१, नांदगाव खंडेश्वर १३,५०९, चांदूर रेल्वे, ८,०९३, तिवसा १४,९५९, मोर्शी १२,५१०, वरुड १०,८९३, दर्यापूर ५७२, अंजनगाव सुर्जी १६,६८१, अचलपूर ४,६४०, चांदूर बाजार १२,८९६ व धामणगाव तालुक्यात ३५,८१० अशी एकूण १,४०,०८७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

बॉक्स

संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यास पेरणी करावी, जिरायती क्षेत्रात रिस्क घेणे परवडणारे नाही. त्यामुळे काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी. सोयाबीन १५ जुलैपर्यंत व तूर १५ ऑगस्टपर्यंत पेरणी करता येते.

- विजय चवाळे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी