शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्णा प्रकल्प यंत्रणा सज्ज

By admin | Updated: June 3, 2015 00:32 IST

धरण जेवढं जीवन जगण्याला फायदेशीर ठरतं तेवढंच ते मरणालाही कारणीभूत ठरतं,याचा प्रत्यय गेल्यावर्षी २७ जुलैच्या ...

देखभालीचा करार : भजदई - सावलमेंढ्याशी जोडली स्वयंचलित यंत्रणा सुरेश सवळे ल्ल चांदूरबाजारधरण जेवढं जीवन जगण्याला फायदेशीर ठरतं तेवढंच ते मरणालाही कारणीभूत ठरतं,याचा प्रत्यय गेल्यावर्षी २७ जुलैच्या सकाळी ११ ते १ वाजता दोन तासात पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावांना आणून दिला होता. याचा सर्वाधिक फटका पूर्णा धरणानजीकच्या ब्राम्हणवाडा (थडी) व देऊरवाडा या गावांना बसला होता. या प्रलयात दोन जीव गेले तर १०० कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. या घटनेला दोन्ही प्रशासनातील समन्वयाचा अभाव जितका दोषी असला तितकाच दोष धरणस्थळावरील कार्यान्वित नसलेली संगणकीय स्वयंचलित प्रणाली व धरणामागे असलेल्या ‘बापजई’ येथील अचानक झालेली ‘ढगफुटी’ हे सुद्धा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. धरणाची निर्मिती केली जाते. मात्र त्याच्या देखभालीवर करण्यात येणाऱ्या खर्चासाठी निधीची उपलब्धता केली जात नाही. याचा प्रत्यय पूर्णा प्रकल्पावरील आतापर्यंत नादुरूस्त असलेल्या स्वयंचलित संगणकीय प्रणालीवरून दिसून आले. गेल्या वर्षीच्या कटू अनुभवाची गंभीर दखल पाटबंधारे विभागाने यावेळी घेऊन पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावासाची पूर्वसूचना देणारी स्वयंचलित संगणकीय यंत्रणा पूर्णा प्रकल्प स्थळावर कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या देखभालीसाठी मेकॅट्रॉनिक्स कंपनी पुणे यांचेसोबत अप्पर वर्धा डॅम डिव्हीजन या विभागाने सन २०१९ पर्यंत करण्यात आला आहेत. या करारात जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्प व अप्पर वर्धा या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यप्रदेशातील भगदई येथे पूर्णा नदीचा उगम आहे तर सावलमेंढा येथे या धरणाचे मध्य केंद्र आहे. गेल्या वर्षी भगदई येथे झालेला मुसळधार पाऊस व बापजई येथे झालेली ढगफुटी यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत २ तासांत ५० सें. मी. पासून तर ३ मीटर धरणाची दारे उघडल्या गेली. यातून दर सेकंदाला २४७६ घनमीटर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे महाप्रलय निर्माण झाला आणि त्यात जीवितहानीसह कोट्यवधींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.पूर्णा धरणस्थळावरील स्वयंचलित संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीची माहिती या प्रणालीवर क्षणात प्राप्त होणार आहे. या प्रणालीवर देखभालीसाठी कंपनीकडून कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून याठिकाणी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहतील.- आशिष राऊत,सहायक अभियंता, पूर्णा प्रकल्प.गेल्या वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी पूर्णा प्रकल्पावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. सध्या धरणातील जलपातळी ४४६.६६ मीटर इतकी असून २२.३२ द. ल.घ.मी. जलसाठा आहे. याची टक्केवारी ५३.४४ इतकी आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या नाही. - सागर चौधरी,सहायक अभियंता,पूर्णा प्रकल्प.