शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात कैदी माफी कपातीच्या शिक्षेपासून वंचित, 3 वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 17:04 IST

कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

गणेश वासनिक

अमरावती : हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी माफी कपातीच्या शिक्षेपासून वंचित आहे. कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरिक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृहांच्या अधीक्षकांना सूचनापत्राद्वारे कैद्यांना देण्यात येणाऱ्या माफी कपातीच्या शिक्षेबाबत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र कारागृह माफी पद्धती नियम १९६२ मधील नियम २४(२) नुसार अधीक्षकांना कैद्यांना नियम २३ नुसार माफी पुस्तकावरून कायमस्वरूपी कमी करण्याची शिक्षा देण्याचे अधिकार बहाल केले आहे. त्यानुसार विभागीय कारागृह उपमहानिरिक्षकांच्या पूर्व मान्यतेने माफी पुस्तकावर पुन्हा कैद्यांना घेता येते. तसेच माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिल्यानंतर कैद्यास अन्य कारागृहात वर्ग करण्यात आले असेल तर वर्ग करण्यात आलेल्या कारागृहाचे अधीक्षक कैद्यास पुन्हा माफी पुस्तकावर घेण्याकरिता विभागीय उपमहानिरिक्षकांना ज्या कारागृह अधीक्षकांनी माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिलेली आहे, त्यांच्यामार्फत शिफारस करू शकतात. 

ज्या कैद्यांना कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कपात केल्याची शिक्षा देण्यात आली, अशा कैद्यांना पुन्हा माफी पुस्तकावर घेणेसाठी विनंती अर्ज कारागृह कार्यालय तसेच शासनाकडे सादर केल्यास त्या कैद्यांना याचा लाभ मिळते. मात्र, २ ते ३ वर्षांच्या कालावधी होऊनही कारागृह महानिरिक्षकांच्या सूचनापत्राचे पालन करण्यात आले नाही. काही कैद्यांची वर्तणूक आणि वागणूक अतिशय चांगली असतानाही ते माफीच्या शिक्षेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. मुंबईचे आर्थर रोड, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, येरवडा, नागपूर, अमरावती, तडोजा आणि कोल्हापूर या ९ मध्यवर्ती कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदी माफी कपाती शिक्षेपासून वंचित आहेत. 

कैद्यांचे सुधारणा व पुनर्वसन उपक्रमांतर्गत न्याय 

कारागृहाच्या पाषाण भिंतीआड शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये चांगली वर्तणूक आणि सुधारणा होण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने कैद्यांचे सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत माफीच्या स्वरूपात मोबदला देण्याची नियमावली आहे. कैद्यांना कारागृहात सुरक्षित ठेवणे जिकरीचे काम आहे. मात्र, काही कैद्यांचे कोणतेही विघातक कृत्य किंवा वाईट उद्देश नाही, अशा कैद्यांना कायमस्वरूपी माफी कपातीमुळे मानसिक तणाव कमी करणे हा देखील यामागील हेतू आहे.

हे कैदी ठरतील शिक्षेच्या माफीचे हकदार

कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्यास कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कमी केल्याच्या शिक्षेनंतर कैद्यांची कारागृहातील वागणूक चांगली असली तरी त्यास माफी मिळत नाही. त्याकरिता कैद्यास कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिल्यानंतर शक्यतो ५ वर्षांच्या कालावधीतील कारागृहातील वर्तणुकीची शहानिशा करून कैद्याची वर्तणूक चांगली असल्यास त्यास पुन्हा माफी पुस्तकावर घेण्याबाबत नियम क्रमांक २४(१) व (२) नुसार योग्य ती कार्यवाही करता येते.

नियमानुसार माफी कपात शिक्षेस पात्र कैद्यांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतात. कैद्यांचे माफी कपातीबाबत वरिष्ठांचे आदेश आल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीCrimeगुन्हा