शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राज्यात कैदी माफी कपातीच्या शिक्षेपासून वंचित, 3 वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 17:04 IST

कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

गणेश वासनिक

अमरावती : हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी माफी कपातीच्या शिक्षेपासून वंचित आहे. कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरिक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृहांच्या अधीक्षकांना सूचनापत्राद्वारे कैद्यांना देण्यात येणाऱ्या माफी कपातीच्या शिक्षेबाबत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र कारागृह माफी पद्धती नियम १९६२ मधील नियम २४(२) नुसार अधीक्षकांना कैद्यांना नियम २३ नुसार माफी पुस्तकावरून कायमस्वरूपी कमी करण्याची शिक्षा देण्याचे अधिकार बहाल केले आहे. त्यानुसार विभागीय कारागृह उपमहानिरिक्षकांच्या पूर्व मान्यतेने माफी पुस्तकावर पुन्हा कैद्यांना घेता येते. तसेच माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिल्यानंतर कैद्यास अन्य कारागृहात वर्ग करण्यात आले असेल तर वर्ग करण्यात आलेल्या कारागृहाचे अधीक्षक कैद्यास पुन्हा माफी पुस्तकावर घेण्याकरिता विभागीय उपमहानिरिक्षकांना ज्या कारागृह अधीक्षकांनी माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिलेली आहे, त्यांच्यामार्फत शिफारस करू शकतात. 

ज्या कैद्यांना कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कपात केल्याची शिक्षा देण्यात आली, अशा कैद्यांना पुन्हा माफी पुस्तकावर घेणेसाठी विनंती अर्ज कारागृह कार्यालय तसेच शासनाकडे सादर केल्यास त्या कैद्यांना याचा लाभ मिळते. मात्र, २ ते ३ वर्षांच्या कालावधी होऊनही कारागृह महानिरिक्षकांच्या सूचनापत्राचे पालन करण्यात आले नाही. काही कैद्यांची वर्तणूक आणि वागणूक अतिशय चांगली असतानाही ते माफीच्या शिक्षेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. मुंबईचे आर्थर रोड, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, येरवडा, नागपूर, अमरावती, तडोजा आणि कोल्हापूर या ९ मध्यवर्ती कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदी माफी कपाती शिक्षेपासून वंचित आहेत. 

कैद्यांचे सुधारणा व पुनर्वसन उपक्रमांतर्गत न्याय 

कारागृहाच्या पाषाण भिंतीआड शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये चांगली वर्तणूक आणि सुधारणा होण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने कैद्यांचे सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत माफीच्या स्वरूपात मोबदला देण्याची नियमावली आहे. कैद्यांना कारागृहात सुरक्षित ठेवणे जिकरीचे काम आहे. मात्र, काही कैद्यांचे कोणतेही विघातक कृत्य किंवा वाईट उद्देश नाही, अशा कैद्यांना कायमस्वरूपी माफी कपातीमुळे मानसिक तणाव कमी करणे हा देखील यामागील हेतू आहे.

हे कैदी ठरतील शिक्षेच्या माफीचे हकदार

कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्यास कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कमी केल्याच्या शिक्षेनंतर कैद्यांची कारागृहातील वागणूक चांगली असली तरी त्यास माफी मिळत नाही. त्याकरिता कैद्यास कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिल्यानंतर शक्यतो ५ वर्षांच्या कालावधीतील कारागृहातील वर्तणुकीची शहानिशा करून कैद्याची वर्तणूक चांगली असल्यास त्यास पुन्हा माफी पुस्तकावर घेण्याबाबत नियम क्रमांक २४(१) व (२) नुसार योग्य ती कार्यवाही करता येते.

नियमानुसार माफी कपात शिक्षेस पात्र कैद्यांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतात. कैद्यांचे माफी कपातीबाबत वरिष्ठांचे आदेश आल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीCrimeगुन्हा