पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यां ...
दुपारी १२ पासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप कायम ठेवले असतानाच घरामागील बाजूने दमयंती नदीच्या पुराचा लोंढा एकाएकी परिसरात घुसला. अनेक घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले. सुमनचा पती यावेळी मजुरीसाठी बाहेर गेला होता. शेजाऱ्यांच्या हा प्रकार ...
भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. र ...
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील ...
भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्म ...
पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले ...
गोलाकार इमारतीतील प्रवाशांच्या प्रतिक्षालयासमोर प्रवाशांच्या दिशेने एकाच वेळेस बारा बसेस उभ्या राहणार आहेत. यात प्रवाशांना बसल्या जागेवरच बसचा फलक दिसणार आहे. बसची माहिती उपलब्ध होणार आहे. या नव्या कामाला अधिक आकर्षक बनविण्याकरिता ग्रॅनाइटचे फ्लोअरिं ...
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली. ...
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, ...