शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, पॅसेंजर गाड्या केव्हा होणार सुरू? अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यामुळे याचा आर्थिक ...

सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, पॅसेंजर गाड्या केव्हा होणार सुरू?

अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यामुळे याचा आर्थिक फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच काही विशेष, एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या रेल्वे गाड्यांना ठराविक स्थानकावर थांबे देण्यात आल्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास दुर्लभ झाला आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचे आगमन होताच मोजक्याच रेल्वे सुरू होत्या. पॅसेंजर गाड्या तेव्हापासून बंद असून, आजतागायत रुळावर त्या धावल्या नाहीत. गरीब, सामान्य प्रवाशांनी शटल अथवा पॅंसेजर गाड्या सुरू कराव्यात, अशी असली तरी कोरोनाचे भय कायम असल्याने मोजक्याच रेल्वे धावत आहेत. लहान-सहान रेल्वे स्थानकावर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे नसल्याने ही रेल्वे स्थानके आता ओस पडू लागली आहेत.

---------------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

- अमरावती-तिरूपती, पुणे

- नरखेड-सिकंदराबाद

- सिकंदराबाद-जयपूर

- हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गितांजली

- गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस

--------------------

कोट

वरिष्ठांकडून पॅसेंजर अथवा शटल रेल्वे सुरू करण्याबाबत पत्र प्राप्त नाही. पॅसेंजर रेल्वे सुरू होतील, अशी केवळ चर्चा आहे. मात्र, बोर्डाकडून अधिकृत जाहीर झाल्यानंतरच त्या सुरू होतील.

- महेंद्र लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती

-----------------

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

टिमटाळा, मालखेड, दीपोरी

कुरूम, माना, येऊलखेड,

गायगाव, पारस, नागझिरी

----------------

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास....

‘‘ हल्ली केवळ मेल, एक्सप्रेस रेल्वे सुरु आहे. या गाड्यांना छोट्या स्थानकावर थांबे नाहीत. त्यामुळे गावाहून शहर गाठायचे म्हटले की, बस अथवा खासगी वाहनांनीच येे-जा करावी लागते. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.

- कमलेश नाईक, माना

--------------

काेट

टिमटाळा येथून बडनेरा ये-जा करण्यासाठी केवळ १० रुपयांत रेल्वेचा प्रवास हाेेतो. मात्र, कोरोनाकाळात रोजगार नाही. तरीही कामकाजानिमित्त बडनेरा शहरात ये-जा करावी लागते. आता बस किंवा ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागताे. त्यामुळे प्रत्येक फेरीत ६० रुपये खर्च येतो.

- माधुरी नागपुरे, टिमटाळा.