शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्ष नव्हे, चळवळ !

By admin | Updated: February 27, 2016 00:01 IST

काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे.

यशोमती ठाकूर : मतभेदापेक्षा मनभेद असू नये, दोनद येथे कार्यकर्ता मेळावाअमरावती : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे सरकार स्थापित होणे आवश्यक आहे. तसेच या चळवळीत काम करीत असताना मतभेद झाले तरी मनभेद असू नये, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. दोनद, अमरावती येथे गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार भैयासाहेब ठाकूर हे होते. आ. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला. मात्र विदर्भ प्रदेश विकासापासून वंचित असल्याची भावना वेळोवेळी व्यक्त होते. पण त्या भागातील जनता विकासाभिमुख नेतृत्वाला नेहमीच बळ देते. याउलट विदर्भात एकमेकांचे पाय ओढण्यात आपण धन्यता मानतो. याचे चिंतन आपण करायला हवे. त्यामुळे नेमकी चूक कुठे होते याची कारणे लक्षात येतील. सध्या देश असो की राज्य यामध्ये विशिष्ट शक्ती कार्यरत झाले आहे. त्यामुळे आपण आपल्या गावाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. माणूस हा कर्तव्याने मोठा होतो. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासन पातळीवर मांडायला हवे. केवळ राज्यात सत्ता गेली म्हणून आपण शांत बसून चालणार नाही, असे ही त्या म्हणाल्या. या मेळाव्याला अमरावती तालुका कॉंग्रेस कमिटी, तिवसा विधानसभा युवक काँग्र्रेस, महिला काँग्रेस व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन हरीश मोरे यांनी, तर आभार नंद खडसे यांनी मानले. (प्रतिनिधी)