शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

महापालिकेला अधिकारांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:18 IST

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच्छता पसरविणाºयांकडून दंड वसूल करुन त्यांचे समुपदेशन करण्याची मोहिम थंडबस्त्यात पडली आहे. मार्च २०१८ मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’आटोपल्यानंतर या मोहिमेला मोठा ब्रेक बसला आहे.

ठळक मुद्देदंड करण्याची मोहीम थंड : गुड मार्निंग पथक कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच्छता पसरविणाºयांकडून दंड वसूल करुन त्यांचे समुपदेशन करण्याची मोहिम थंडबस्त्यात पडली आहे. मार्च २०१८ मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’आटोपल्यानंतर या मोहिमेला मोठा ब्रेक बसला आहे.राज्याचा नागरी भाग ‘हगणदारीमुक्त’ घोषित झाल्यानंतरही शहरात काही ठिकाणी उघड्यावर प्रात:विधी उरकविला जात असल्याचे निरिक्षण नगरविकास विभागाने नोंदविले. त्यापार्श्वभूमिवर गुड मार्निंग पथके नव्याने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. त्या आदेशाचाही अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका प्रशासनाकडून नव्याने अधिकारी कर्मचाºयांचा समावेश असलेली पथके गठित करण्यात न आल्याने ‘ओडी स्पॉट’ वाढले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण संपुष्टात आल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाºयांकडून वसूल करण्यात येत असलेल्या दंडाच्या कारवाईला मर्यादा आली आहे.घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरामध्ये ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत निर्मितीच्या जागीच कचºयाचे विलगीकरण करुन त्या कचºयावर प्रक्रिया करण्याच्या सुचना नागरी स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने महापालिका , नगरपालिका व नगरपंचायती स्वच्छतेसाठी झगडत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. त्यापार्श्वभूमिवर जे नागरिक स्वच्छतेस सहकार्य करीत नाहीत, त्यांना दंड करणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमिवर घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे अनुपालन न करणाºया व्यक्ती वा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत. त्याबाबत महापालिकेने जनजागृतीही चालविली आहे. पहाटे जी वाहने कचरा संकलित करतात, त्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकांवरुन दंडाबाबत नागरिकांना माहिती दिली जाते. प्रत्यक्षात नागरिकांकडून अनेक बाबतीत अस्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे अस्वच्छता करणाºयांकडून १०० ते ५००रुपये व कचरा जाळणाºयांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. नगरविकास विभागाने त्यासंदर्भात ३० डिसेंबरला अधिकृत शासननिर्णय जाहिर करुन महापालिकांना त्याबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आलेत, मात्र या अधिकारांची महापालिका नगरपालिका पुर्ण ताकदीने वापर करीत नसल्याची ओरड आहे.