शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

महापालिकेला अधिकारांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:18 IST

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच्छता पसरविणाºयांकडून दंड वसूल करुन त्यांचे समुपदेशन करण्याची मोहिम थंडबस्त्यात पडली आहे. मार्च २०१८ मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’आटोपल्यानंतर या मोहिमेला मोठा ब्रेक बसला आहे.

ठळक मुद्देदंड करण्याची मोहीम थंड : गुड मार्निंग पथक कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच्छता पसरविणाºयांकडून दंड वसूल करुन त्यांचे समुपदेशन करण्याची मोहिम थंडबस्त्यात पडली आहे. मार्च २०१८ मध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’आटोपल्यानंतर या मोहिमेला मोठा ब्रेक बसला आहे.राज्याचा नागरी भाग ‘हगणदारीमुक्त’ घोषित झाल्यानंतरही शहरात काही ठिकाणी उघड्यावर प्रात:विधी उरकविला जात असल्याचे निरिक्षण नगरविकास विभागाने नोंदविले. त्यापार्श्वभूमिवर गुड मार्निंग पथके नव्याने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. त्या आदेशाचाही अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका प्रशासनाकडून नव्याने अधिकारी कर्मचाºयांचा समावेश असलेली पथके गठित करण्यात न आल्याने ‘ओडी स्पॉट’ वाढले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण संपुष्टात आल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाºयांकडून वसूल करण्यात येत असलेल्या दंडाच्या कारवाईला मर्यादा आली आहे.घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरामध्ये ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत निर्मितीच्या जागीच कचºयाचे विलगीकरण करुन त्या कचºयावर प्रक्रिया करण्याच्या सुचना नागरी स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने महापालिका , नगरपालिका व नगरपंचायती स्वच्छतेसाठी झगडत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. त्यापार्श्वभूमिवर जे नागरिक स्वच्छतेस सहकार्य करीत नाहीत, त्यांना दंड करणे आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमिवर घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे अनुपालन न करणाºया व्यक्ती वा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत. त्याबाबत महापालिकेने जनजागृतीही चालविली आहे. पहाटे जी वाहने कचरा संकलित करतात, त्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकांवरुन दंडाबाबत नागरिकांना माहिती दिली जाते. प्रत्यक्षात नागरिकांकडून अनेक बाबतीत अस्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे अस्वच्छता करणाºयांकडून १०० ते ५००रुपये व कचरा जाळणाºयांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. नगरविकास विभागाने त्यासंदर्भात ३० डिसेंबरला अधिकृत शासननिर्णय जाहिर करुन महापालिकांना त्याबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आलेत, मात्र या अधिकारांची महापालिका नगरपालिका पुर्ण ताकदीने वापर करीत नसल्याची ओरड आहे.