शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने मेमरी झाली फॉरमॅट; स्मरणशक्तीचा वापर झाला कमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST

‘मोबाईल फास्ट’ संकल्पना राबवा अमरावती : मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंडी पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा ...

‘मोबाईल फास्ट’ संकल्पना राबवा

अमरावती : मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंडी पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा सोडला तर कोणाचा नंबर लक्षात राहत नाही. स्वत:चे एकापेक्षा जास्त नंबर असतील, तर तेही लक्षात राहत नाहीत. मोबाईलमुळे आपल्या मेमरीवर परिणाम झाला आहे. जे मोबाईल वापरत नाहीत, त्यांची मेमरी चांगली आहे. कारण आपण मेंदूला त्रास देत नाही. स्मरणशक्तीचा वापर करीत नाही. त्याचे भविष्यात खूप वाईट परिणाम होऊ शकतात. वेळीच मुलांना पाल्यांना सुधारायला हवं. लॉकडाऊनच्या काळात तर मोबाईलचा वापर अधिक वाढला आहे. आबालवृद्ध त्यावर व्यस्त असल्याचे आढळून येते. हे योग्य नसून, त्याचे गंभीर परिणाम नजीकच्या काळात दिसतील, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त हाेत आहे.

बॉक्स

हे टाळण्यासाठी...

एक दिवस संपूर्ण कुटुंबाने मोबाईल, टीव्ही, संगणक अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे. त्याला ‘मोबाईल फास्ट (उपोषण)’ असे नाव द्यायचे.

मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे, मोबाईलवरील गेम नव्हे

पाठांतर करणे, स्तोत्र, मंत्र म्हणजे कविता, भाषण-संवादकला जोपासणे.

चिंतन, मनन करणे प्राणायाम योग व्यायाम करणे.

बॉस

असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी स्मरणशक्तीकडे दुर्लक्ष

पाढे पाठ न करता कॅल्क्यूलेटर वापरणे

बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

कोट

माेबाईलमुळे नवतंत्रावरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी सगळे सक्रिय जिवंत स्मृतीमध्ये साठवावे, याचे भान राहिले नाही. याकरिता निर्जीव यंत्राचा आधार लोक घेऊ लागले आहेत. स्मृती जिवंत आहे. मोबाईल मटेरियल आहे. आपली स्वत:ची जिवंत स्मृती साेडून मनुष्य यंत्राने साठवलेल्या स्मृतीवर विसंबून राहू लागला आहे. हे धोकादायक व तोट्याचे लक्षण आहे. यामधून मनुष्य आपले अपरिमित नुकसान करून घेत आहेत.

डाॅ. स्वाती सोनोने, मानसोपचारतज्ज्ञ

कोट

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या शैक्षणिक कार्यासाठी महत्वाचा घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे, तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचार क्षमता कमी होत आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर किंवा गणित सोडविणे हेसुद्धा मोबाईल पाहिल्याशिवाय होत नाही.

- मोहन बैलके, पालक

कोट

वयोमानानुसार स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. पण, मोबाईलमुळे ती अधिक क्षीण होते. आपण नैसर्गिकपणे काही गोष्टी डोक्यात साठवू शकतो. मग यंत्राची काय गरज आहे? आजही डायरीमध्ये फोन नंबर लिहून ठेवण्याची सवय कायम आहे.

- वामनराव फरकुंडे, ज्येष्ठ नागरिक