शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Gandhi Jayanti Special : ...अन् राष्ट्रसंतांच्या भजनाने गांधीजींचेही मौन सुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 12:26 PM

राष्ट्रपिता-राष्ट्रसंतांची प्रथम भेट, सेवाग्राम आश्रमात एक महिना मुक्काम

संदीप राऊत 

तिवसा (अमरावती) : 

‘एक दिन जाना गांधीजी ने मेरा भजन अप्रतिमसे

वह कह गये, फिरसे कहो, रहते हुए भी मौनसे

हसते कहा फिर दुसरे दिन, मौन मेरा छूट गया

मै मस्त होने पर भजन मे, ख्याल से भी हट गया’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयातील ही आठवण त्यांच्या भजनातील माहात्म्य अधोरेखित करते. १४ जुलै १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता व राष्ट्रसंत या दोन महान विभूतींची प्रथमच भेट झाली. राष्ट्रसंतांना पाहताच महात्मा गांधी प्रभावित झाले होते. हे कुणी साधू-संत नसून देश कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे व समाजप्रबोधन करणारे महान युगप्रवर्तक असल्याची प्रचीती महात्मा गांधी यांना पहिल्या भेटीतच आली होती.

२४ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३५ दरम्यान तुकडोजी महाराजांनी सालबर्डीच्या घनदाट जंगलात महारुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. यामध्ये दहा लाखांवर महिला-पुरुषांना अन्नदान करण्यात आले; परंतु काही समाजकंटकांना महाराजांची समाजसेवा पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी महाराजांच्या पावन कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तुकड्याबुवा धनदांडग्यांकडून जमा केलेल्या धान्याची जंगलात वायफळ उधळण करीत बुवाबाजी करीत असल्याचा आरोप करण्यात आला. सत्यता जाणून घेण्यासाठी गांधीजींनी नागपूर येथील काँग्रेस नेते बाबूराव हरकरे व शंकरराव टिकेकर यांना आदेश देऊन महाराजांना सेवाग्राम आश्रमात येण्यासाठी संदेश पाठवला. प्रथम भेटीतच काहीही संवाद न साधता महाराजांबद्दल पसरविण्यात आलेला गैरसमज गांधीजींच्या मनातून चुटकीसरशी दूर झाला. एक महिन्याच्या सान्निध्यानंतर महाराजांनी सेवाग्राम आश्रमाचा निरोप घेतला त्यावेळी अतिशय जड अंतःकरणाने गांधीजी व आश्रमातील सेवेकऱ्यांनी महाराजांना अनुमती दिली. त्यावेळी गांधीजींनी महाराजांना एक चरखा भेट दिला.

म्हणूनच महाराज म्हणतात,

‘मै गांधीजी का नही शिष्य रहा,

ना गांधी कही मेरे भक्त रहे

पर प्रेम था हम दोनो मे बडा,

वह मिटा न सका कोई लाख कहे’

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज