शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार जागांवर कमळ फुलले

By admin | Updated: October 19, 2014 23:12 IST

नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज

अमरावती : नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज करुन ‘अच्छे दिन’ आल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीला एकही जागा मिळविता आली नाही, हे विशेष.१५ आॅक्टोबर रोजी मतदान आटोपताच कोण विजयी होणार, याविषयी तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, रविवारी मतमोजणी सुरु होताच पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. एकमात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची लढत राहिली. अखेर जगताप यांचा ९७४ मतांनी निसटता विजय झाला. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या विजयी झाल्यात. त्यांनी भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान यशोमतींना विरोधकांनी लक्ष्य केले. मात्र, त्यांनी विकास कामांच्या भरवशावर दुसऱ्यांदा विजय खेचून आणला. मतदान आटोपताच काँग्रेसच्या एकमात्र यशोमती ठाकूर निवडून येतील, असा अंदाज बांधला गेला होता.युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्यात. मात्र शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. याउलट भाजपने चार जागा काबीज करुन हिंदुत्ववादी विचारसरणीची मते एकवटण्यात यश मिळविले. मोर्शी व बडनेऱ्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु दर्यापूर, मेळघाट, धामणगाव, तिवसा, अमरावती व अचलपुरात सेनेचे उमेदवार तिसऱ्या, चवथ्या क्रमांकावर राहिलेत. गत विधानसभा निवडणुकीत खाते न उघडणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळीही भोपळ्यावरच समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळीही बच्चू कडू, रवी राणा हे दोन्ही अपक्ष उमेदवार पुन्हा विजयी झाले आहेत. मनसेचे तिवसा, धामणगाव, दर्यापूर, मोर्शी, अचलपुरात इंजिन धावले नाही. रिपाइं (गवई गट) ने दर्यापूर, तिवसा, अचलपूर व अमरावतीत उमेदवार उभे केले. मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. बसपने जिल्ह्यात आठही जागांवर उमेदवार उभे करुन खाते उघडण्याची धडपड चालविली परंतु अपयश आले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेसला दोन जागांचे नुकसान झाले आहे. शिवसेनेकडे असलेली एक जागाही सांभाळता आली नाही.