शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी घेतले भाज्यांपासून लोणची बनविण्याचे धडे

By admin | Updated: December 25, 2014 23:25 IST

बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी स्त्री सक्षम व्हावी, या उदात्त विचारसरणीतून स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी सखी मंचची स्थापना केली. तेव्हापासून सखी मंचच्या माध्यमातून महिलांचे मनोबल

अमरावती : बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी स्त्री सक्षम व्हावी, या उदात्त विचारसरणीतून स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी सखी मंचची स्थापना केली. तेव्हापासून सखी मंचच्या माध्यमातून महिलांचे मनोबल उंचावणारे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून स्थानिक मनोरमांगल्य सभागृहात महिलांसाठी ‘भाज्यांपासून लोणची’ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेत करूणा नाशिककर यांनी सखींच्या हिरव्या भाज्यांच्या रेसिपीजची माहिती दिली. कोणतेही प्रिझरर्व्हेटिव्ह न वापरता भाज्यांमधील पौष्टिकता कशी टिकवून ठेवता येईल, याचे धडे सखींनी गिरविले. सखींनी या सर्व माहितीची टिपणे काढली.
दररोजच्या प्रशासकीय कामकाजाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून मिनी महापौर अर्चना इंगोले, नगरसेविका सुनीता भेले, संगीता वाघ, अर्चना राजगुरे यांनीदेखील या कार्यशाळेत हजेरी लावली. सखी मंचच्या रंजना वाघ यांनी सखी मंचविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला सखींची मोठी गर्दी उसळली होती.
सखी मंचच्या संयोजिका स्वाती बडगुजर यांनी आगामी सदस्यता नोंदणीविषयी माहिती दिली.
तसेच महिलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा कार्यशाळांचे वेळोवेळी आयोजन करण्याचे आश्वासनदेखील दिले आहेत. कार्यशाळेसाठी अर्चना एरंडे, सरिता नांदूरकर, जयश्री पाबळे, भारती क्षीरसागर, नलिनी थोरात यांनी कार्यक्रमाकरिता यशस्वी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)