शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जयश्रीला मृत्यूने गाठलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 00:29 IST

सासरच्यांच्या अमानवीय छळाची बळी ठरलेल्या जयश्रीने मृत्युला तब्बल वर्षभर थोपवून धरले. मात्र,

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सासरच्यांच्या अमानवीय छळाची बळी ठरलेल्या जयश्रीने मृत्युला तब्बल वर्षभर थोपवून धरले. मात्र, गलितगात्र झालेल्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या जयश्रीचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. जयश्री जीवनाची लढाई हरली असली तरी यानिमित्ताने समाजासमोर आलेली महिला अत्याचाराची काळी बाजू भयावह आहे. सन २०१६ च्या सुरूवातीला जयश्री दुधे अत्याचारप्रकरण समोर आले होते आणि अवघे समाजमन हेलावले होते. लोकमतनेच जयश्रीवरील अत्याचाराला वाचा फोडली होती. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील जयश्रीचा विवाह नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील युवकाशी झाला होता. तिला दोन मुले, मुलगी अशी अपत्ये आहेत. मात्र, काही वर्षांनी तिच्या पतीचे अपघाती निधन झाले. आधीच आजारी असलेली जयश्री आणखीच खचली. मात्र, तिच्या या शारीरिक व मानसिक दौर्बल्याचा फायदा घेऊन सासरच्या मंडळींनी जयश्रीवर अत्याचार सुरू केले. तिला त्यांनी तब्बल वर्षभर घरात डांबून ठेवले. तिच्यावर अनन्वित अत्याचार केलेत. अक्षरश: तिची उपासमारही केली. ही बाब कुऱ्हा येथे तिच्या वडिलांना माहिती पडताच त्यांनी जयश्रीला माहुरहून अमरावतीला आणले. येथे आधी तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ‘लोकमत’ने हा भयंकर प्रकार लोकदरबारात मांडला. त्यानंतर अनेक समाजसेवी संघटना सुद्धा जयश्रीच्या बाजुने उभ्या ठाकल्यात. आ. यशोमती ठाकूर यांनी जयश्रीची भेट देऊन तिला ‘ऐश्वर्या राय’ असे संबोधून तिला धीर दिला होता. पश्चात जयश्रीला पारश्री हॉस्पिटलचे डॉ. राठी यांनी उपचारासाठी दत्तक घेतले. तिच्यावर तेथे महिनाभर उपचार झाले. पश्चात तिचे वडील तिला कुऱ्हा येथे घेऊन गेले. कुऱ्हा येथील पीएचसीमध्ये तिच्यावर तब्बल महिनाभर अद्ययावत उपचार करण्यात आलेत. त्यानंतर तिच्या वडिलांसमवेत ती कुऱ्हा येथील घरी राहात होती. वडिलांची परिस्थिती जेमतेमच असल्याने कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आधीच आजारी असलेली जयश्री अधिक तग धरू शकली नाही आणि तिने शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. संघर्ष संपला : सासरच्यांच्या अमानवीय छळाची कहाणी आईच्या मृत्युचा आघात ४जयश्रीवर पारश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिची प्रकृती हळूहळू सुधारत होती. त्यामुळे सगळ्यांनाच उभारी आली होती. जयश्री सुद्धा खूश होती. जगण्याची ईच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, त्याच दरम्यान तिच्यावर आणखी एक आघात झाला. जयश्रीच्या आईचा मानसिक तणावामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जयश्री अगदीच पोरकी झाली. अंत्यसंस्काराला मुले आली पण... ४जयश्रीचा मृत्यू जणू सगळ्यांनी गृहितच धरलेला. सासरच्यांनी तर तिला जिवंतपणीच मरणयातना दिलेल्या. जयश्रीचे सासू-सासरे अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. मात्र, काही नातलगांसह तिची तिन्ही मुले मात्र अंत्यसंस्काराला उपस्थित होती. आईच्या मृत्युचा शोक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असला तरी बरीच वर्षे आईपासून विलग राहिल्याने मुले देखील संभ्रमित असल्याचे जाणवत होते. सासरच्यांनी मागितले पोलीस संरक्षण ४अंत्यसंस्कारासाठी माहुरहून आलेल्या जयश्रीच्या सासरच्या मंडळींनी कुऱ्हा येथे पोहोचताच आधी कुऱ्हा पोलीस ठाणे गाठून पोलीस संरक्षणाची मागणी केली. मागील प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, हा त्यांचा उद्देश होता. मात्र, गावातील समाजसेवी युवक संतोष धुमाळे, मनीष पोकळे, मंगेश भोगले, संतोष भैसे, बंटी बगरे व आमले यांनी अंत्यसंस्कार शांततापूर्ण वातावरणात पार पाडले.