शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

पालकमंत्री, रिद्धपूर ते तिवसा राज्य मार्गाचा विकास रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेचे जन्मस्थळ ...

पालकमंत्री, रिद्धपूर ते तिवसा राज्य मार्गाचा विकास

रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूरच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी केली.

पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते रिद्धपूर ते तिवसा राज्य मार्ग ३०० चे महामार्गाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, सरपंच गोपाल जामठे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता ढोमणे, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, उपसरपंच सबीर, तात्यासाहेब मेश्राम, रमेश काळे, पंकज हरणे, मनोज टेकाडे, धनंजय तट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, केवळ रस्त्याचा विकास नव्हे, इतरही विविध विकासकामांसाठी स्वतंत्र आराखडा करण्यात येईल. आशियाई विकास बँक अर्थसाहाय्यित रिद्धपूर-तिवसा राज्य मार्ग ३०० ची सुधारणा बांधकाम होणार आहे. त्यासाठी १६१ कोटी मंजूर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, गावाच्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता राहणार आहे, वीज पाणी व इतर सेवा वाहिन्यांसाठी विशेष पाईप लाईन राहणार, एसटी बससाठी विशेष थांबा व शेल्टर राहणार आहे.

श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर स्वामी हे कुण्या एका धर्म-पंथाचे नसून, ते सकलांचे आहेत. म्हणून तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सर्वसमावेश असला पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी आ. देवेंद्र भुयार यांनी केली.

--------------

स्वतंत्र आराखडा

रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. ज्या-ज्या ठिकाणी गोविंदप्रभू राहिले, त्या-त्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही पालकामंत्र्यांनी सांगितले.

---------------