शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाविनाच विद्यार्थी साजरा करणार स्वातंत्र्यदिन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:03 IST

स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.१५ आॅगस्टला शाळांच्या मैदानात गणवेशात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याच्या साक्षीने ध्वजारोहण होत असते. दरवर्षीचा हा अनुभव यंदा मात्र विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. गणवेश पुरविण्याच्या धोरणात शासनाने केलेल्या बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गणवेश खरेदीसाठी पालकांना प्रत्येकी दोनशे रूपयेप्रमाणे चारशे रूपये अनुदान दिले जाणार आहे. पण, व्यावहारिक त्रुटींमुळे योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र जि.प. शाळांमध्ये दिसून येत आहे.पूर्वी गणवेशाची रक्कम संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केली जात होती. शाळा समितीच्या शिफारसीवरून गणवेशाची खरेदी करण्यात येत होती. मात्र, यात भष्टाचार होत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्याने योजनेत बदल करण्यात आला. आता पालकांनी गणवेश खरेदी करून देयक शाळेत सादर केल्यास विद्यार्थी-पालकांच्या संयुक्त खात्यात चारशे रूपये जमा केले जातात.खात्यासाठी हजार रुपयांचा खर्चगणवेशासाठी विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागते. त्यासाठी किमान १ हजार रूपये खर्च येतो. कारण काही रक्कम खाते उघडताना बँकेत जमा ठेवावी लागते. दुसरे म्हणजे दोनशे रूपयांत एक गणवेश होतच नाही. म्हणजेच पालकांना त्यांच्या जवळचे पैसे टाकून गणवेश खरेदी करावे लागतात. जिल्ह्यात दीड हजारांवर शाळा असून १ लाख १८ हजार ७४६ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहेत. गणवेश खरेदीसाठी ४ कोटी ७४ लाख ९८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.अनंत अडचणीग्रामीण भागातील पालकांना गणवेश खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब परवडण्यासारखी नाही. ग्रामीण भागात मजूर, शेतकरी व आदिवासींची आर्थिक परिस्थिती जादाची गुंतवणूक करण्याची नाही. त्यामुळे गणवेश खरेदी करण्याच्या भानगडीत पालक पडत नाहीत. काही अपवादात्मक शाळांमध्ये शंभर टक्के गणवेश विद्यार्थ्यांनी घेतल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. प्रत्यक्षात अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे चित्र आहे.गणवेशासाठी विद्यार्थी व आईचे बँक खाते काढताना काही अडचणी होत्या. ग्रामशिक्षण समितीमार्फत गणवेश खरेदीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत- जयश्री राऊतप्रभारी शिक्षणाधिकारीप्राथमिक