शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

राखीव वनजमिनीवर अर्थकेंद्र उभारले कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:02 IST

राखीव वनजमिनीवर बांधकामासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, दर्यापूर तालुक्यातील वाल्मीकपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील राखीव वनजमिनीवर अर्थकेंद्राचे (इंटरप्रिटेशन सेंटर) बांधकाम करण्यास उपवनसंरक्षकांनी परवानगी दिली तसेच या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअकोट-दर्यापूर मार्गावर बांधकाम : जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राखीव वनजमिनीवर बांधकामासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, दर्यापूर तालुक्यातील वाल्मीकपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील राखीव वनजमिनीवर अर्थकेंद्राचे (इंटरप्रिटेशन सेंटर) बांधकाम करण्यास उपवनसंरक्षकांनी परवानगी दिली तसेच या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.परतवाडा वनक्षेत्रांतर्गत अकोट-दर्यापूर मार्गालगतच्या मौज वाल्मीकपूर येथील जुने कम्पार्टमेंट ५४२ आणि नवीन कम्पार्टमेंट ५०६ ‘अ’ वर्ग सर्वे क्रमांक १३२/६०५ मध्ये अर्थकेंद्र बांधकामास वनविभागाने परवानगी दिली आहे. राखीव वनजमिनीवर बांधकामासाठी डीपीडीसीकडे केंद्र सरकारची मान्यता नाही. विचलन प्रस्ताव मंजूर झाले नसताना नियम गुंडाळून अर्थकेंद्र उभारणीसाठी शेकडो सागवान वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. वनसंवर्धन अधिनियम २००३ कलम ९(१) नुसार संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करणे आवश्यक होते. परंतु, वनाधिकाºयांनी हा प्रकार दडवून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सामूहिकपणे वनसंवर्धन कायद्याची पायमल्ली केली जात असताना एनजीओंना अभय कुणामुळे दिले जाते, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. राखीव वनजमिनीवर बांधकामास प्रारंभ करताना कोणत्याही प्रकारच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. अर्थकेंद्राच्या बांधकामासाठी शेकडो सागवान वृक्षाची कत्तल कुणाच्या परवानगीने करण्यात आली, याबाबत चौैकशीची मागणी दिलीप कापशीकर यांनी केली आहे. सागवानची कटाई केल्यानंतर राखीव वनजमिनींवरील लाकडाचे काय झाले, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूरराखीव वनजमिनींवर अर्थकेंद्र साकारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला आहे. तत्कालीन उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी यासंदर्भात डीपीसीकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी निधीबाबत मान्यतेचा प्रस्ताव समितीपुढे ठेवला. त्यानंतर या बांधकामाच्या निर्मितीसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आहे.राखीव वनक्षेत्रात अर्थकेंद्र बांधकामासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. नेमके कोणत्या आधारावर परवानगी दिली व निधी उपलब्ध करून दिले, याबाबत चौकशी करू.- अशोक कविटकरसहायक वनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :forest departmentवनविभाग