शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

अस्मानी, सुल्तानी संकटासह वन्यप्राण्यांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अरुण पटोकार - पथ्रोट : कृषीव्यवस्थेचा कणा असलेला कृषक अस्मानी, सुल्तानी संकटासह वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पुरता वैतागल्याचे दिसून येत आहे. ...

अरुण पटोकार - पथ्रोट : कृषीव्यवस्थेचा कणा असलेला कृषक अस्मानी, सुल्तानी संकटासह वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पुरता वैतागल्याचे दिसून येत आहे. मेळघाटच्या वन्यविभागात वावरणाऱ्या वन्यप्राण्यांचा संचार सखल भागात वाढला असून रोही, हरणांचे कळप शेतात हौदोस घालत आहे. शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसत आहे.

नानाविध समस्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाचविला पुजला आहे, यात तीळमात्रही शंका नाही. गतवर्षी पेरणीच्या हंगामात नामांकित बियाणे उत्पादित कंपन्यांनी बोगस सोयाबीन बियाणे देऊन केलेली फसवणूक केली. उगवलेल्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, पीक काढणीला आल्यावर पावसाचे आगमन, उत्पादित मालाची प्रतवारी घसरल्याने कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. हेही थोडे थोडके नसताना कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे थैमानसह तूर पिकावर मर रोग आल्यानंतरही पीक विमा कंपनीने ठेंगा दाखविला.

या सर्व संकटांना तोंड देत रोहिणी व मृग नक्षत्र बऱ्यापैकी बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आशेची नवी स्वप्नं पाहत चेहऱ्यावर उसणे अवसान व हात उसणवार घेत पेरणी केली. मात्र, आर्द्रा नक्षत्रात पाऊस विलगीकरणात गेल्याने पेरलेले बियाणे माकड, हरिण, रोही, रानडुक्करांनी वेतून फस्त केले. यांच्या तावडीतून सुटलेले उगवले असता पिकाचे कोंब नागवाणी (खुरपडीने) फस्त केले. काही तणनाशकाने व तळपत्या सूर्याच्या उष्णतामानाने जळाली. चिखलदरा तालुक्यात सोयाबीन पीक केसाळ अळीने खाल्ले. सध्या शिल्लक पीक रोही व हरिण स्वाहः करीत आहे. जवळपास ही परिस्थिती अचलपूर, अंजनगाव, चिखलदरा तालुक्यात दिसून येत आहे. वनविभागासह शेतकरी हिताच्या सरकारने वन्यप्राण्यांच्या हैदोसाला प्रतिबंध घालावा, असा आर्त टाहो बळीराजा फोडत आहे.