शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे वीज बिल भरणार शासन

By admin | Updated: February 25, 2015 00:27 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या अमरावतीसह राज्यभरातील २३ हजार ८११ गावांमधील दुष्काळग्रस्तांचे ...

अमरावती : मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या अमरावतीसह राज्यभरातील २३ हजार ८११ गावांमधील दुष्काळग्रस्तांचे २१५ कोटी रुपयांची वीज देयके राज्य शासनामार्फत भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १९८१ गावांतील दुष्काळग्रस्तांचा समावेश आहे. घरगुती तसेच कृषिपंपांच्या वीज देयकांच्या एकूण रकमेपैकी ३३.५ टक्के रक्कम शासन सवलतीच्या रुपाने देते. विभागातील पाचही जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मोठा दुष्काळ पडला आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खरीपातील जिल्ह्यात १९८१ गावांतील अंतीम पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी दिसून आली आहे. या दुष्काळग्रस्त गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभागाचे आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीस स्थगिती, वित्त बिलात ३३.५ टक्के सूट, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता आवश्यक, जेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि शेती पंपाची विजजोडणी खंडित न करणे यांचा समावेश आहे. कृषिपंपाची वीज खंडित न करणे, खंडित केली असल्यास कनेक्शन पुन्हा सुरू करणे, घरगुती, कृषिपंपांना वीज देयकांमध्ये सवलत देऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)