शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर इंदिरा नगरातील विजेचा खांब खासगी जागेतून हटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST

रस्ता झाला प्रकाशमय : पालिकेचा निर्णय, नागरिकांना उभारता येणार दुसरा माळा मोर्शी : येथील इंदिरानगरातील विजेचा खांब अखेर खासगी ...

रस्ता झाला प्रकाशमय : पालिकेचा निर्णय, नागरिकांना उभारता येणार दुसरा माळा

मोर्शी : येथील इंदिरानगरातील विजेचा खांब अखेर खासगी जागेतून हटविण्यात आला आहे. नगरपालिकेच्या या जनहितार्थ निर्णयामुळे ५० वर्षांपासून रेंगाळलेला अवघड प्रश्न निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे इंदिरानगरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना त्यांच्या घराची उंची वाढविण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे. त्याचवेळी खासगी जागेतील विजेच्या खांबांचे अतिक्रमण दूर झाले असून त्या भागातील मुख्य रस्ताही प्रकाशमान झाला.

इंदिरानगर भागात टेलिफोन एक्सचेंजला लागून रहिवासी क्षेत्र आहे. या क्षेत्रात एकाच ओळीने आठ-दहा कुटुंबे राहतात. या कुटुंबांतील प्रत्येक सदस्याने प्लॉट विकत घेऊन त्या ठिकाणी घरे बांधली. परंतु या घरांची उंची वाढविताना अर्थात दुसऱ्या माळ्याचे बांधकाम करताना सार्वजनिक वीज वाहिनीचे तार यमदूत म्हणून उभे ठाकले होते. त्यामुळे ५० वर्षांत येथे कोणालाही आपल्या घरावर दुसरा माळा उभारता आला नाही. ही अडचण लक्षात आल्यानंतर तेथीलच एक रहिवासी राजेंद्र लाखोडे यांनी नगरपालिकेकडे तक्रार नोंदविली. तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने त्याची शहानिशा केली. त्या वेळी असे लक्षात आले की त्या भागातील प्लॉटची विक्री होण्यापूर्वीच सार्वजनिक दिवाबत्तीची सोय म्हणून विजेचे खांब उभे करण्यात आले. यातील काही खांब अक्षरश: काही नागरिकांच्या खासगी जागेत होते. परंतु ते हटवायचे तर पालिकेने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, असे तत्कालीन म. रा. विद्युत मंडळाचे (आताचे महावितरण) म्हणणे होते. त्यामुळे बराच काळ हा मुद्दा दोन कार्यालयांमधील आरोप-प्रत्यारोपात अडकून पडला.

दरम्यानच्या काळात विद्यमान नगरसेवक वैशाली कोकाटे व त्यांचे यजमान भूषण कोकाटे यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा न. प. प्रशासनाच्या पटलावर आणला. नगरपालिका ही नागरिकांना सुविधा पुरविणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे पालिकेने आवश्यक तो खर्च महावितरणला देऊन तेथील नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, अशी मांडणी वैशाली कोकाटे यांनी न. प. सभांमध्ये केली. तत्कालीन उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनीही या बाबीस दुजोरा देत कोकाटे यांचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे पालिकेने महावितरणकडे आवश्यक ती रक्कम भरण्याची तयारी दर्शविली.

महावितरणने उभारली नवी वाहिनी

पालिकेच्या या जनहितार्थ निर्णयानंतर महावितरणने विजेचे पर्यायी खांब रस्त्याच्या कडेला उभे करून त्यावर नव्याने वीज वाहिनी उभारली. या घटनेमुळे इंदिरानगरातील नागरिक कमालीचे आनंदित झाले आहेत. राजेंद्र लाखोडे व तेथील काही रहिवाशांनी दहापेक्षा अधिक वर्षांच्या कालखंडापासून सुरू केलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.