शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

-तरीही आडतीचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच

By admin | Updated: December 22, 2014 22:38 IST

कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातील आडत रद्द करण्याच्या पणन महासंघाच्या निर्णयामुळे बाजार समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आली आहे.

अमरावती : कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातील आडत रद्द करण्याच्या पणन महासंघाच्या निर्णयामुळे बाजार समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आली आहे. सकृतदर्शनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत असला तरी आडतीचा भुर्दंड अन्य कुठल्या प्रकारात शेतकऱ्यांच्या माथी मारला जाणार आहे. अडत खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी तेवढ्या रकमेचा फटका शेतमालाच्या दराला बसणार असल्याने हा भार शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे.
शेतमाल खरेदी विक्रीमधील आडत रद्द करुन शेतकऱ्यांनी बाजार समितीत कुठलीही आडत न देता थेट माल विक्री करण्याचे परिपत्रक शनिवारी काढले. त्यामुळे ६० वर्षांपासून प्रस्तावित अडत्यांची भूमिका आता बदलणार आहे.
यापूर्वी खरेदीदार हा आडत्यांचे कमिशन वजा करुन शेतमाल खरेदी करत असे. आता तो कमिशनएवढी रक्कम कमी करुन मालाची खरेदी करेल. त्यामुळे शेतमालाला जेवढी रक्कम यापूर्वी मिळत होती तेवढीच रक्कम त्याला यानंतरही मिळणार आहे.
व्यापाऱ्यांचा शिष्टमंडळ सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सोमवारी भेटल्यानंतर पणन संचालकांच्या आदेशाला त्यांनी स्थगिती दिली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत प्रचलित पध्दतीनेच आडत कपात होणार आहे. मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समितींमध्ये नियमित खरेदी विक्री व्यवहार राहणार आहे. (प्रतिनिधी)