शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटींची मागणी, आठ लाख शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:24 IST

आठ लाख शेतकरी बाधित : पश्चिम विदर्भातील कमी पैसेवारीच्या गावांना ‘एनडीआरएफ’चा निधी

ठळक मुद्देआठ लाख शेतकरी बाधित : पश्चिम विदर्भातील कमी पैसेवारीच्या गावांना ‘एनडीआरएफ’चा निधी

अमरावती : मागील वर्षी कमी पैसेवारीमुळे दुष्काळस्थिती जाहीर झालेल्या मदतीपासून वंचित ३,४२७ गावांसाठी ७४१ कोटी ३ लाख ४३ हजार रुपयांची मागणी गुरुवारी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे केली. पश्चिम विदर्भात जिरायती व बागायती अशा ७ लाख ८९ हजार ७०५ शेतकऱ्यांना बाधित १० लाख २७ हजार ६३७ हेक्टरसाठी सदर मागणी करण्यात आलेली आहे.

दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार विभागातील २४ तालुक्यांना कमी पावसाचा ट्रिगर लागू झाल्याने निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला व याच तालुक्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती शेतीसाठी ६,८०० रुपये प्रतिहेक्टर व बागायती शेतीसाठी १८,००० रुपये या निकषाप्रमाणे मदत देण्यात आली.

शासनाने ८ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा पावसाचा खंड या निर्देशांकान्वये अमरावती विभागातील ४७ महसूल मंडळात दुष्काळस्थिती जाहीर केली व या गावांना दुष्काळाच्या आठ सवलती जाहीर केल्यात. मात्र, मदतनिधी दिला नव्हता. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या पत्राद्वारे ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्ष्काळाच्या सवलती जाहीर केल्या. मात्र, ही सर्व गावे मदतनिधीपासून वंचित राहिली. त्यामुळे २९ जून २०१९ च्या पत्रान्वये महसूल विभागाच्या उपसचिवांनी दुष्काळ मदत निधीपासून वंचित गावांसाठी आवश्यक निधीच्या मागणीचे पत्र विभागीय आयुक्तांना पत्र दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी २५ जुलै रोजी ७४१ कोटींची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना गतवर्षीचा दुष्काळनिधी मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बागायती क्षेत्रासाठी हवेत ६७.८८ कोटीपश्चिम विदर्भात ३२ हजार २६७ शेतकºयांच्या बागायती ३७ हजार ७१५ हेक्टर क्षेत्रात झालेल्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांप्रमाणे ६७.८८ कोटींची मागणी करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्याला ४६.५५ कोटी, अकोला जिल्ह्यात ११.२१ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६.९४ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात २.९६ कोटी, तर वाशीम जिल्ह्यात १९.९८ लाख रुपयांची आवश्यकता आहे. दोन हेक्टर मर्यादेतच ही मदत मिळणार आहे.बॉक्स

जिरायती शेतीसाठी जिल्हानिहाय मागणी (कोटी)जिल्हा         गावे    शेतकरी    क्षेत्र    मदतअमरावती    १०५७    २६८०८६    ३७३७२३    २५४.१३अकोला     २६१    ७६४२१    ९७८९९    ६६.५७यवतमाळ    १४८४    १८८३१०    ३०२०१९    २०५.३७बुलडाणा    ५८६    २१२६८९    २००२७२    १३६.१८वाशीम    ३९    ११९३२    १६००८    १०.८८एकूण        ३४२७    ७५७४३८    ९८९९२१    ६७३.१४ 

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊस