शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षांना काही अर्थ आहे काय? गुणी विद्यार्थ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० परीक्षा जून-जुलै महिन्यात आटोपल्या. आता ऑगस्ट महिन्यात उन्हाळी-२०२१ परीक्षेचे नियोजन विद्यापीठाने केले ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० परीक्षा जून-जुलै महिन्यात आटोपल्या. आता ऑगस्ट महिन्यात उन्हाळी-२०२१ परीक्षेचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. परंतु, हिवाळी-२०२० परीक्षेचे नियोजन, परीक्षेची पद्धती, परीक्षेची अंमलबजावणी व त्याचे स्वरूप लक्षात घेता विद्यापीठाच्या या ऑनलाईन परीक्षांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे वास्तव आहे. यात गुणी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड आहे.

यूजीसीच्या निकषानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मात्र, या ऑनलाईन परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता अनेक लोक उपस्थित करीत आहेत. कारण या परीक्षा ऑनलाईन आहेत. या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या व घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यापीठाचे कोणतेही मॉनिटरिंग नाही. कोण परीक्षा देत आहे, याची खातरजमा होत नाही. कशी परीक्षा दिली जात आहे, ते माहीत नाही. हिवाळी-२०२० परीक्षेतील अनेक विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरून कॉन्फरन्सिंगद्वारे पेपर सोडवल्याचे सांगत आहेत. पुस्तक उघडून अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. हीच स्थिती उन्हाळी-२०२१ परीक्षेची राहणार आहे. महाविद्यालयाकडून परीक्षेसाठी पेपरची लिंक देण्यात येत असल्याने 'जवळ'च्या अनेक विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नांची उत्तरे माहीत असतात. अशा विद्यार्थ्यांनी पेपरची लिंक दिल्यानंतर अवघ्या १०-१५ मिनिटांत पेपर सोडवून तो पेपर सबमिट केल्याची माहिती आहे. परीक्षेची गोपनीयता केवळ नाममात्र आहे. परीक्षेसाठी पेपरची लिंक विद्यापीठाने दिली, तर या गोष्टीला आळा बसू शकतो. पण, विद्यापीठाने ती जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवलेली आहे. त्यामुळे सर्व घोळ सुरू आहे. कशीबशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा 'निकाल' लावणे‌ एवढेच विद्यापीठाचे धोरण दिसून

येत आहे. विद्यापीठाच्या या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा खरोखरच 'निकाल' लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता गुणी विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

-----------------

कोरोनामुळे केंद्रावर परीक्षा घेता येत नाही. यूजीसीच्या निकषाचे पालन करून ऑनलाईन परीक्षा येण्यात येत आहे. परिस्थितीनुसार परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ

-------------

ज्या विद्यार्थी कधी महाविद्यालयाचे तोंड पाहिले नाही, त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. ही बाब गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. कोरोनाचा बागुलबुवा थांबयला हवा. ऑफलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाेर यावी.

- समीर वानखडे, अमरावती.