शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला लाभला जैवविविधतेचा वारसा

By admin | Updated: May 22, 2016 00:10 IST

मेळघाट, पोहरा, मालखेड व महेंद्रीसारख्या समृध्द जंगलामुळे अमरावती जिल्ह्याला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे.

जागतिक जैवविविधता दिवस : वाढती लोकवस्ती, जलप्रदूषणाचे संकटअमरावती : मेळघाट, पोहरा, मालखेड व महेंद्रीसारख्या समृध्द जंगलामुळे अमरावती जिल्ह्याला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. मात्र, वाढती लोकवस्ती व जलप्रदूषणामुळे ही जैवविविधता संकटात सापडली आहे. जागतिक जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून नागरिकांनी ही जैवविविधता जोपासण्याचा प्रण केला, तरच भविष्यात ही जैवविविधता टिकेल. जिल्ह्यातील गवताळ माळरानात जल अधिवास असलेली तलाव, धरणे व वन विभागाने तयार केलेले कृत्रिम पाणी स्रोतामुळे जैवविविधता संपन्न झाली. जिल्ह्यात वाघापासून तर जंगलातील पक्ष्यांपर्यंत विविध प्रजातीचे पशूपक्षी आढळून येतात. जंगलात सस्तन प्राण्यांच्या ४० प्रजाती आढळून येत असून त्यामध्ये सर्वोच्च स्थान हे वाघाचे आहे. मेळघाटात जवळपास वाघांची संख्या ४० आहे.जिल्ह्यातील जगंलात वाघ बिबट, चितळ, काळवीट, तडस, नीलगाय आदी वन्यप्राण्यांसोबत पक्ष्यांच्या शेकडो प्रजातीसुद्धा आढळून आल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत जंगलाच्या दिशेने वाढती लोकवस्ती वन्यप्राण्यांच्या अधिवासावर घाला घालत आहे. लोकवस्तीतील नागरिक जंगलाच्या दिशेने आगेकूच करीत असल्यामुळे वन्यप्राणी अधिवास सोडून शहराच्या दिशेने वाटचाल करताना आढळून आले आहे. शिकारीचे वाढते जाळे जैवविविधता नष्ट करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच जंगलातील पाणी स्त्रोतामध्ये वाढते प्रदूषणसुद्धा जैवविविधतेला गालबोट लावीत आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगल आणखी समृध्द बनविण्यासाठी व पुढील पिढीसाठी ही जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी आतापासून पाऊल उचलणे गरजेचे आहे.८०० प्रकारचे वृक्ष -वेलीमेळघाट हा विविध वनस्पतीने संपन्न असून तेथे ८०० पेक्षा अधिक वृक्ष, गवत व वेली अशा विविध वनस्पती आढळतात. मात्र, दिवसेंदिवस वाढती वृक्षतोड ही जैवविविधता नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहे. (प्रतिनिधी)जैवविविधतेतील प्रत्येक घटक पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण आहे. पर्यावरण संतुलीत असल्यास मानवी जीवन सुसह्य होईल. त्यासाठी जल, जमीन, जंगल व पर्यायाने त्यांतील जैवविविधता टिकून ठेवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. - जयंत वडतकर,मानद वन्यजीव रक्षक.